calendar

header ads

shivkalin dinvishesh

 JANUARY 1

 JANUARY 2

 JANUARY 3

 JANUARY 4

 JANUARY 5

 JANUARY 6

 JANUARY 7

 JANUARY 8

 JANUARY 9

 JANUARY 10

 JANUARY 11

 JANUARY 12 

 JANUARY 13

 JANUARY 14

 JANUARY 15

 JANUARY 16 

 JANUARY 17

 JANUARY 18

 JANUARY 19

 JANUARY 20 

 JANUARY 21

 JANUARY 22

 JANUARY 23 

 JANUARY 24

 JANUARY 25 

 JANUARY 26

 JANUARY 27 

 JANUARY 28 

 JANUARY 29 

 JANUARY 30 

 JANUARY 31

FEBRUARY 1 

FEBRUARY 2 

FEBRUARY 3 

FEBRUARY 4

FEBRUARY 5 

FEBRUARY 6

FEBRUARY 7

FEBRUARY 8

FEBRUARY 9 

FEBRUARY 10

FEBRUARY 11

FEBRUARY 12

FEBRUARY 13

FEBRUARY 14

FEBRUARY 15

FEBRUARY 16

FEBRUARY 17

FEBRUARY 18

शिवदिनविशेष
१८ फेब्रुवारी इ.स.१६५३
छत्रपती शिवरायांनी गोपाळ भटास वर्षासन चालू केले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१८ फेब्रुवारी इ.स.१६६६
मराठा फौजेचा विजापूरच्या आदीलशहाच्या मुलुखात घुसून जागोजागी हल्ले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१८ फेब्रुवारी इ.स.१८६९
महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवरायांची रायगडावरील समाधी १८ फेब्रुवारी इ.स.१८६९ मध्ये शोधून काढली व भारतभर पहिली शिवजयंती सुरु केली.आणि महाराजांच्या जिवनावरील पहिला पोवाडा लिहिला.

FEBRUARY 19

शिवदिनविशेष
१९ फेब्रुवारी १६३०
"छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव
३५० वर्ष परकीय जुलमी सत्तेच्या गुलामगिरीच्या शृंखलेत अडकलेल्या महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी एक दैवी अवतार पृथ्वीवर प्रकटला.
थोरले महाराज साहेब "फर्जद शहाजीराजे भोसले" आणि "राजमाता जिजाऊ साहेब" यांच्या पोटी "किल्ले शिवनेरी" येथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.

पुत्र जिजाऊंना झाला,
पुत्र शहाजीराजांना झाला,
पुत्र सह्याद्रीला झाला,
पुत्र महाराष्ट्राला झाला,
पुत्र भारतवर्षाला झाला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
१९ फेब्रुवारी १८६९
"महात्मा जोतिबा फुले" यांनी "किल्ले रायगड" वरील छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढून तीचा जिर्णोद्धार केला,
आणि जगातील पहिली "शिवजयंती" आज "१९ फेब्रुवारी १८६९" रोजी साजरी केली.



*६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव* ​🏇🗡 *येसाजी​*🗡🏇  *दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव* 🏇🗡 *बाजी​*🗡  *हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव* 🏇🗡 *तानाजी​*🗡🏇  *आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव* 🏇🗡 *संताजी​*🗡🏇  *दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव* 🏇🗡​ *धनाजी​*🗡🏇  *जो🐯 वाघाला फाडतो, त्याचं नाव* 🏇🗡 *संभाजी​*🗡🏇  *"अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो,* *त्याचंच नाव "शिवाजी​* ⚔ 🐯 ​  🏇🗡 *"जय शिवराय"​*🐯 🏇🗡 *जय शिवाजी* 🗡. 🏇                     🏇🤺🚩 *जय शिवराय* 🚩🏇🤺  🏇🤺 *प्रत्येक ग्रुपवर गेलाच पाहिजे..*🏇🤺

FEBRUARY 20

शिवदिनविशेष
२० फेब्रुवारी इ.स.१६६०
छत्रपती शिवरायांनी "खारेपाटन" जिंकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
२० फेब्रुवारी इ.स.१७०७
स्वराज्याचे तिसरे छत्रपती आणि शिवरायांचे द्वितीय सुपुत्र "छत्रपती राजाराम महाराज" यांच्या पत्नी "महाराणी ताराराणी" यांचं "अहमदनगर" जवळ निधन.
"छत्रपती संभाजी महाराज" व "छत्रपती राजाराम महाराज" यांच्या मृत्यूनंतर "महाराणी ताराराणी" यांनी तब्बल १८ वर्ष स्वराज्याची सुत्रे सांभाळली.

FEBRUARY 21

शिवदिनविशेष
२१ फेब्रुवारी इ.स.१६६०
छञपती शिवरायांनी अंकोला जिंकले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
२१ फेब्रुवारी इ.स.१६६५
कर्नाटकातील "कारवार" येथील इंग्रजांच्या वखारीत "छत्रपती शिवराय" छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांना कळली,
खुद्द शिवराय ४००० मावळ्यांसह कारवार नजीक आलै असून उद्या दि. २२ फेब्रुवारीला कारवार वर हल्ला करणार असल्याचे इंग्रजांना कळले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
 इंग्रजांच्या वखारीत "छत्रपती शिवराय" छापा घालणार असल्याची खबर इंग्रजांच्या हेरांना कळली,
खुद्द शिवराय ४००० मावळ्यांसह कारवार नजीक आलै असून उद्या दि. २२ फेब्रुवारीला कारवार वर हल्ला करणार असल्याचे इंग्रजांना कळले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
२१ फेब्रुवारी इ.स.१७०७
मुघल बादशहा औरंगजेबचा अहमदनगर जवळ "खुलताबाद" येथे दुपारी १२ च्या दरम्यान मृत्यू.
खुलताबाद मधेच त्याची कबर बांधली गेली. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खनमध्ये उतरलेला हा बादशहा अखेर २७ वर्ष झुंजून महाराष्ट्राच्या मातीमध्ये दफन झाला.

FEBRUARY 22

शिवदिनविशेष
२२ फेब्रुवारी इ.स.१६६५

छत्रपती शिवरायांनी कारवार जिंकले. कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी महाराजांचा मुक्काम होता. येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्‍यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांच्या समोर रूजू केली.

FEBRUARY 23

लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र राजे दत्ताजीराव यांचा स्मृती दिवस


*२३ फेब्रुवारी इ.स.१६२३*
२३ फेब्रुवारी रोजी राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र राजे दत्ताजीराव यांचा स्मृती दिवस. राजे दत्ताजीराव जाधवराव यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला.त्यांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड व उमरद रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसराव्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,करणखेड,वडाळी व सारवडी या होत.


*२३ फेब्रुवारी इ.स.१६६५*
भिमगडाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज काळी नदी (गोवा) ओलांडून रवाना झाले.
*२३फेब्रुवारी इ.स.१७३९*
चिमाजी आप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंडयावर हल्ला चढवला.
चिमाजी आप्पा यांनी १७३९ साली फिरंगणाच उच्चाटन केल. ४ वर्षे सुरु असलेल्या मोहिमेचा शेवट वसई जिंकून साजरा केला गेला.⛳

FEBRUARY 24

छत्रपती शिवरायांनी कारवार जिंकून कारवार सोडले.
शिवदिनविशेष
छत्रपती शिवरायांनी कारवार जिंकून कारवार सोडले. पण इंग्रजांना लुटण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली.
ते जाता जाता म्हणाले, "आमची होळीची शिकार शेरखानाने घालवली!"
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
२४ फ़ेब्रुवारी इ.स.१६७०
"किल्ले राजगड" येथे छत्रपती शिवरायांच्या दुसऱ्या राणीसाहेब सोयराबाई यांच्या पोटी "रामराजे उर्फ राजाराम" यांचा जन्म . पुत्र पालथा जन्मल्यामुळे अतिविद्वान धर्मपंडीतांनी शुभ-अशुभ चर्चा करायला सुरूवात केली. पण शिवराय म्हणाले, "पुत्र पालथा जन्माला आला, चांगले झाले. तो दिल्लीची पातशाही सुद्धा पालथी घालील". आणि पुढे १६८९ मध्ये छत्रपती संभाजीराजेंच्या हत्येनंतर राजाराम महाराज मराठ्यांचे ३ रे छत्रपति झाले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
२४ फेब्रुवारी इ.स.१६७४
"महाशिवरात्र"
सरसेनैपती कुडतोजी उर्फ प्रतापराव गुजर पुण्यतिथी"
मराठ्यांच्या गनिमी काव्याने स्वराज्यावर चालून आलेला बेहलोलखान जेरीस आला. वेळ प्रसंग पाहुन तो मराठ्यांना शरण आला. आता शरण आलेल्याला मारू नये असा धर्म सांगतो, त्यामुळे "सरसेनापती प्रतापराव गुजर" या तत्वनिष्ठ मराठ्याने त्याला धर्मवाट दिली व तो गनीम जिव वाचवून गेला. पण नंतर दगाबाज बेहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालुन आला आणि शिवरायांनी रयतेला त्रास देणाऱ्या बहलोलखानास सोडल्या बद्दल प्रतापरावांची पत्र पाठवून कानऊघडणी केली, "बहलोल खानास गर्दीस मिळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका. तोच सल मस्तकात घेऊन "सरनोबत प्रतापराव गुजर" जगत होते. महाशिवरात्रीचा दिवस उगवला, प्रतापराव गुजर हे त्यांच्या ६ शिलेदारांनिशी सहज फिरायला म्हणून बाहेर पडले होते. मुख्य छावणी पासून पुष्कळ दूर असताना त्यांना बातमी समजली की बेहलोल खान मोठ्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून येतोय. काही दिवसांनी महाराजांचा रायगडावर राजाभिषेक होणार होता. तेव्हा महाराजांना अष्टप्रधानांपैकी ७ प्रधानांचा मुजरा झडणार होता. मात्र सरसेनापतींचा मुजरा झडणार नव्हता, कारण "बेहलोल खानास गर्दीस मिळविल्याविना आम्हास रायगडी तोंड दाखवू नका", असा प्रत्यक्ष महाराजांचाच हुकूम होता. बेहलोलखानाचं नाव ऐकून अंतरात धुमसत असलेल्या सुरूंगावर जणू शिलगावणीच पडली. डोळ्यातून संतापाच्या ठिणग्या उडू लागल्या, विजेच्या चपळाईने प्रतापरावांनी घोड्याला टाच मारली आणि ते सहा शिलेदारही प्रतापरावांच्या मागे सुसाट दौडत निघाले.
फक्त सात, हो फक्त सातच वीर.
अन अचानक प्रतापराव बेहलोल खानावर तुटून पडले. त्यांच्यासोबत होते,
विसाजी बल्लाळ,
दीपोजी राउतराव,
विट्ठल पिलाजी अत्रे,
कृष्णाजी भास्कर,
सिद्दी हिलाल,
विठोजी शिंदे.
या आपल्या ६ जणांनी प्राणार्पण केले. स्वराज्यातील अजून एक खिंड पावन झाली.
नेसरी खिंडीचे तीर्थक्षेत्रात रूपांतर झाले.
याच युद्धाचे वर्णन करताना कुसुमाग्रज म्हणतात,
"म्यानातून उसळे तलवारीची पात,
वेडात मराठे वीर दौडले सात".
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
पुण्यात शनिवार वाड्यास मोठी आग लागली.

FEBRUARY 25

२५ फेब्रुवारी इ.स.१६७४
सरसेनापती प्रतापराव गुजर यांना वीरमरण.
वेडात मराठे हे गीत पहिल्यांदा ऐकल्यावर अंगावर शहारा आला होता. हा काय प्रकार आहे याची कल्पना नव्हती. मग माग काढायला सुरवात केली. काही पुस्तके मिळवली आणि अधाश्यासारखी वाचून काढली. अनेकवर्षांपुर्वी वाचलेली ही शौर्य कथा दिली आहे.
प्रतापरावांसारख्या वरिष्ठ योध्याने असं वागायला नको होतं असं सर्वाचंच मत. पण प्रतापरावांची बनावट आणि शिवाजीमहाराजाचे शब्द यांचा परिपाक म्हणजे त्यांची ती कृती असावी असं मला वाटतं . महाराजांनी हरतऱ्हेने पारखून घेतलेले प्रतापराव मूर्ख असतील असं मला वाटत नाही. मुळात त्याकाळी शिवाजी महाराज होणे हा एक चमत्कार आहे असं म्हणायला अडचण वाटत नाही. एक उदाहरण घेऊया. लढाईत एकतर मारायचं किंवा मरायचं असे दोनच पर्याय मराठी शिपाई गड्याजवळ असायचे. तेथे शिवाजी महाराजांनी गनीमीकावा आणि यशस्वी माघार यांसारखे प्रकार रुजवले. येथे शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता दिसून येते.

महाराज कित्येकदा मराठ्यांना राजपुतांचा दाखला देत असत आणि म्हणत की राजपुत मरतात किंवा मारतात पण जिंकत नाहीत. रणात यश महत्त्वाचं आहे. माघार – पुढाकार नाही. वेळ पडली तर माघार घ्या पण लढाई जिंका. असं महाराजांचं तत्त्व. मात्र प्रत्येक मराठा शिपाईगडी हे पचवू शकला नव्हता. कदाचित आपले प्रतापराव सुद्धा याच प्रकारातले.

पण त्यांचे शौर्य आणि पराक्रम त्यामुळे कुठेच झाकोळला गेला नाही. प्रतापराव आणि त्या अनाम सहा वीरांना मानाचा मुजरा.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
२५ फेब्रुवारी इ.स.१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीमधल्या जवळ जवळ सर्वच किल्ल्यांची तोडफोड केली.
आजच्या दिवशी इंग्रज अधिकारी "कर्नल डिफन" यांने चाकणचा "संग्रामदुर्ग" हा भुईकोट किल्ला उध्वस्त केला.

FEBRUARY 26

शिवदिनविशेष
२६ फेब्रुवारी इ.स.१६४७
थोरले महाराज फर्जंद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे परगण्याची जहागिरीची जबाबदारी दिली.

FEBRUARY 27

शिवदिनविशेष
२७ फेब्रुवारी इ.स.१६७३
छत्रपती शिवराय रायगडावरून पन्हाळा गडाकडे.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२७ फेब्रुवारी इ.स.१६९८
“राजाराम महाराज” जिंजी किल्ल्याहून स्वराज्यात दाखल व किल्ले विशाळगड येथे मुक्कमी.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
२७ फ़ेब्रुवारी इ.स.१७३१
शाहू महाराज (सातारा गादी) आणि संभाजी महाराज (कोल्हापुर गादी ) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली.

FEBRUARY 28

शिवदिनविशेष
२८ फेब्रुवारी इ.स.१६७३
"छत्रपती शिवराय" पन्हाळगडावरून  जावळीच्या खोऱ्यातील "किल्ले प्रतापगड" वर मुक्कामी.

FEBRUARY 29

शिवदिनविशेष
२९ फेब्रुवारी इ.स.१६६१
छत्रपती शिवरायांनी निजामपुरवर छापा टाकला.

FEBRUARY 30

FEBRUARY 31

MARCH 1

MARCH 2

*२ मार्च इ.स.१६६०*
सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवाजीराजे मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. सिद्दी जौहरने २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळासह पन्हाळगडाला वेढा घातला 
*२ मार्च इ.स.१६८७*
औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता. तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस.


*२ मार्च इ.स.१६६०*
सिद्दी जौहरचा पन्हाळगडाला वेढा
सिद्दी जौहरच्या मोहिमेची बातमी हेरांकडून ऐकून शिवाजीराजे मिरजेचा वेढा अर्धवट ठेवून पन्हाळगडावर स्थीर झाले. सिद्दी जौहरने २०००० घोडेस्वार आणि ३५००० पायदळासह पन्हाळगडाला वेढा घातला 
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
*२ मार्च इ.स.१६८७*
औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता. तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
*२ मार्च इ.स.१७००*
छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू...  महाराणी ताराबाईंनी  राज्य कारभार हाती घेतला... 
औरंग्याने शंभुराजांची अमानुष हत्या केली...
आता मराठे घाबरतील,शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं... पण घडलं भलतचं.... शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी लागला...राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे औरन्गजेबाला टक्कर देवू लागले...दक्षिनेतील जिंजीच्या किल्ल्यावर राहून राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले...
या काळात राजारामराजांना संताजी घोरपडे, धनाजी जाधव आशा रणधुरंधर सेनापति तसेच प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अशा कारभारयांची साथ लाभली...मुघलांशी निर्णायक युद्ध जिंकने अशक्य होते... म्हणून राजारामांनी मुघलांनी मिळवलेला जो भाग मराठे जिंकतील तो भाग त्यांची जहागीर बनवण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले... वेग-वेगळे मराठा सरदार जागो-जागी मुघल सैन्यावर आक्रमण करू लागले... संधी मिळताच त्यांचा पराभव करून रसद लुटू लागले... आपली पिछेहाट होताना दिसताच पसर होवू लागले..
मुघलंनी जिंजीला वेढा दिला...पण राजाराम पसार होवून विशालगडावर गेले... तेथून सातारा,कर्नाटक पुन्हा महाराष्ट्र अशा चकमकी होवू लागल्या..महाराष्ट्रात मुघलांना धुळ चारायची हेच एकमेव लक्ष्य मराठ्यांसमोर होते. त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबायाला ते तयार होते.. त्यांना सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा होताच. शेतकरी दिवसा शेती करून रात्री सैनिक बनत होता..परन्तु, दुर्दैवाने महाराष्ट्राची पाठ सोडली नाही.. २ मार्च रोजी सिंहगडावर मराठ्यांचा तिसरे छत्रपति राजाराम राजांचा सिंहगडावर मरण पावला..निधन झाले तेंव्हा राजाराम महाराज ३० वर्षाचे होते.. त्यांच्या काळखंडातच सिन्धुदुर्गावर शिवरायांचे मंदिर उभारन्यात आले. 
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
*२ मार्च इ.स.१७९५*
खरडा येथे मराठा सेना आणि निजाम यांच्यात महाभयंकर युद्ध होण्यास झाले यावेळी नागपूर, बडोदा, इंदोर येथील रघुजी भोसले दुसरे, गायकवाड,तुकोजी होळकर आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले होते
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
*२ मार्च इ.स.१८१८*
इंग्रजांनी सिंहगडावर तोफा डागायला सुरवात केली, दख्खन ताब्र्यात आल्यवर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या सर्व किल्ल्यांवर तोडफोड केली.

MARCH 3

३_मार्च_१६७९
मोरोपंत पेशव्यांनी विजापूरकरांकडून कोप्पळ जिंकले.

३_मार्च_१६६०
शाहीस्तेखान स्वराज्यात घुसला, त्याचा पहिला मुक्काम किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या सोनवडी या गावात.

३_मार्च_१६६०
सिद्दी जौहरने किल्ले पन्हाळा ला घातलेल्या वेढ्याच्या दुसऱ्याच दिवशी आदिलशहाने छत्रपती शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजांना छत्रपती शिवरायांना मदत न करण्यासाठी धमकीचे पत्र पाठवले.

३_मार्च_१६६५
मोगल सरदार मिर्झाराजा १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला.
मागील ३ वर्षात शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहिस्तेखानाची बोटे कापली, सुरत बेसुरत केली आणि त्यावर पत्र पाठवून आपले उद्दिष्ट स्पष्ट कळविले,
आता औरंगजेबाला सर्वात जिगरबाज सरदार दख्खन मध्ये
पाठवणे भाग होते.

३_मार्च_१६८९
मुघल फौजा छत्रपती संभाजीराजेंना कैद करून भीमा
कोरेगावला घेऊन आल्या

३_मार्च_१७०७
औरंगजेबाची खोदली कबर
औरंगजेबाचा नगरला दुपारी साधारण १२ वाजता मृत्यू, महाराष्ट्रातील खुलताबाद येथे मराठ्यांनी खोदली औरंग्याची कबर.

MARCH 4


४_मार्च_१६६०
सिद्दी जौहरने पन्हाळा गराडला.
शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले.
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते.
जोवर शिवराय पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती छत्रपती शिवाजी महाराज आखणार होते.
कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते.
अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा जौहरने घट्ट आवळला.

४_मार्च_१६६७
छत्रपती शिवाजी महाराजांनी कलबरगा परगण्यातील हिरापूर वर छापा टाकला

४_मार्च_१६७७
दक्षिण दिग्विजय मोहीम
शिवाजी महाराज हैद्राबाद शहरातील गोवळकोंडा किल्ल्याजवळ दाखल.

४_मार्च_१८१८
दक्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी बहुतेक सर्व किल्यांची तोडफोड केली, त्यात विसापूरचा किल्ला कर्नल पर्थारणे तोफा डागून उध्वस्त केला.
आज किल्ल्याची काही मीटरभर तटबंदी योग्य स्थितीत उरली आहे .

MARCH 5

५_मार्च_१६५९
कोकणामध्ये शिवाजी महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले.
लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली.
या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी राजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले.

५_मार्च_१६६६
औरंगजेबाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान.
त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.
आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ?
केवळ कल्पनाच केलेली बरी !
आपल्या नऊ वर्षाच्या युवराज संभाजीराजांना बरोबर घेऊन
दि. ५ मार्च १६६६ या दिवशी शिवाजीराजांनी राजगडावरून आग्ऱ्यास जाण्यासाठी गडाबाहेर पाऊल टाकले.
त्यांचेबरोबर फक्त तीनशे सैनिक होते.
मिर्झाराजांनी आपला एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर दिला.
त्याचे नाव तेजसिंह कछवा.
औरंगजेबाचाही एक खास प्रतिनिधी महाराजांबरोबर देण्यात आलेला होता.
त्याचे नाव गाझीबेग तवझुक.
महाराजांच्या वाटखर्चासाठी औरंगजेबाने एक लाख रुपये मंजूर केले होते.
शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजासह !!!

५_मार्च_१६७३
कोंडाजी फर्जंद व आनाजी दत्तो या मंडळिंनी गुप्तपणे हेरगिरी करून पन्हाळ्याची सारी माहिती मिळवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळ्याचा विडा अवघ्या साठ मावळ्यानीशी कोंडाजी फर्जंद यांना दिला आणि ती रात्र आली,
ज्या रात्री पन्हाळ्यात शिरकाव करून पन्हाळा घेण्याचा मनसुबा पार पडणार होता☝️

*५ मार्च इ.स.१६५९*
#शिवरायांच्या_तलवारीचा_खरा_इतिहास
छत्रपती शिवजी महाराजांच्या हातात जी तलवार होती तीच तलवार म्हणे शिवरायांना आई भवानी ने दिली ??
आई भवानीला जर इतकी रयतेची शिवराज्याची काळजी होती तर तलवार ऐवजी शिवरायांना आधुनिक बनावटीची बंदुकच का नाही दिली ??
कशी देनार ?? जीने तलवारच दिली नाही ती बंदुकतरी कशी देनार ??
शिवरायांना कोणी देवी बिवी प्रसन्न झाली , वरदान दिले या इतिहासात मारलेलेल निव्वळ थापा आहेत ...
शिवाजी महाराज एक नैसर्गिक रुपातच कर्ते पुरुष होते त्यांना असल्या वरदान बारदानाची अजिबात गरज नव्हती
म्हणुनच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात ,"छत्रपती शिवरायांचे नाव घेतलल्यावर हिंदूच्या ३३ कोटी देवांची फलटन बाद होते."
पण त्यांनी इतिहासातुन थापा मारल्या आणि आम्ही गपगुमान पचविल्या..."
तलवारीचा खरा इतिहास असा......
दिनांक ५ मार्च १६५९ रोजी महाराज वाडीचे सावंत यांच्या सोबतीने कुडाळला आले होते , तेथे पोर्तुगाल मध्ये तयार करण्यात आलेली हि तलवार युरोपियन व्यापाऱ्याने विक्रीस ठेवली होती.
या तलवारीची खासियत शिवाजी महाराजांनी अचूकतेने जाणली. ती तलवार वजनाने हलकी पण किमतीने बरीच वजनदार होती. ती न गंजणाऱ्या विशेष धातूने बनविली होती .तिचे पाते पातळ असूनही विशेष अश्या न मोडणाऱ्या विशिष्ट पोलादाने बनविण्यात आले होते .. अशी हि आधुनिक तलवार हिरेजडीत मुठ आणि सोन्याच्या धातूत तयार केली असल्यामुळे आणखीनच मौल्यवान होती याशिवाय तलवारीची धार अफलातून होती तलवारीच्या समोर येणारा क्षणातच आपला प्राण गमाविल अश्या धाटणीची .
महाराजांना गनिमांना संपवायचे होते येथे रयतेचे राज्य उभारायचे होते त्यासाठी महाराजांना अशी वजनाने हलकी ,धारेने तेज आणि न मोडणारी सपसप वार करू शकेल अशा तलवारीची महाराजांनी खूप गरज होती त्यावेळी महाराजांनी ती तलवार रोखीने ३०० होणांमध्ये खरेदी केली .(३००होन = त्यावेळचे एक हजार पन्नास रुपये )
शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार करताना हिशोब ठेवण्यात अगदी चोख असत याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराजांनी ३०० होण मोजून विकत घेतलेली तलवार , तिची नोंद शिवाजी महाराजांच्या दफ्तर खाण्यात करण्यात आली असून कीर्द खाते ( इन्कम & एक्स्पेंडीचर अकौंट ) मध्ये खर्चाच्या कॉलममध्ये नोंद करून महाराजांनी या तलवारीबाबाद गोंधळ माजू नये , भाकड कथा रचल्या जाऊ नये यासाठी प्रबंध करून ठेवला आहे.......
पण तरीही प्रतीक्रांतीवाद्यानी शिवरायांचे दैवीकरण केले बहुजन त्यास फसले भुलले...

*५ मार्च इ.स.१६५९*
कोकणामध्ये महाराजांची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत यांची बंखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठवले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी करून लखम सावंताची परिस्थिती बिकट केली. या संकटाला तोंड देण्यासाठी आजच्या दिवशी महाराजांशी तह करून महाराजांचे मांडलिकत्व पत्करले व तहाप्रमाणे महाराजांनी लखम सावंताला मदत करून त्याचे संरक्षण केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि कुडाळकर सावंतांमधील तहनामा -
ता. ५ मार्च १६५९
श्री
सन १०६८ फसली
तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ
प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे. कलम १
किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे. कलम १
स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे. कलम १
प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे. कलम १
प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे. कलम १
शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "

*५ मार्च इ.स.१६६६*
औरंगजेबाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांचे राजगडाहून आग्र्याकडे प्रस्थान. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर. आऊसाहेबांची मनस्थिती आज काय असेल ? केवळ कल्पनाच केलेली बरी ! शिवाजी महाराज आज मृत्यूच्या दाढेत प्रवेश करायला निघत होते, ९ वर्षाच्या युवराजासह !!!

*५ मार्च इ.स.१७७८*
कोल्हापूरकरांचा तह
फेब्रुवारीमध्ये सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले.

*५ मार्च इ.स.१८७९*
१८७९ नंतर फडके यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी दौलतराव नाईक यांच्या मदतीने लोणी जवळ धामरी गावावर पहिला दरोडा टाकला. यामध्ये त्यांना फक्त तीन हजार रुपये मिळाले. त्यानंतर फेब्रुवारी १८७९ मध्ये लोणी व खेडवर दरोडा टाकून लूटमार केली. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरी जवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रु. चे कापड मिळाले. यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही.

MARCH 6


*● ६ मार्च १६७३*
*अखेर १२ वर्षानंतर पन्हाळा स्वराज्यात पुन्हा दाखल केला...!!*
*अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जद यांनी किल्ला जिंकला... अन्नाजी दत्तो, गणोजी कावले आणि मोत्याजी खालेकर हे सोबतचे सरदार.*
*शिवरायांनी पन्हाळ्यावरुन सुटका करून घेतल्यानंतर हा किल्ला आदिलशाहीला द्यावा लागला होता. तो राजाभिषेकापूर्वी स्वराज्यात यावा असे शिवरायांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी कोंडाजी फर्जंद यांना रायग़डी बोलावून घेतले आणि  मोहिमे आधीच सोन्याचे कड़े बक्षिस म्हणून दिले आणि 'यशस्वी होउन या असे सांगूनच मोहिमेवर पाठवले....!!!*
*कोंडाजी बाबा फर्जंद यांनी शिवरायांचे स्वप्न पूर्ण केले...!!*

*● ६ मार्च १६७०*
*जिंका आदेश दिधला शिवभूपातींनी (कोंडाजी फर्जंद)*

*● ६ मार्च १६६०*
*४ मार्च च्या दिवशी सिद्दी जौहरने पन्हाळा वेढला (वेढा* *घातला).आणि शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले शिव छत्रपतींना* *प्रतापराव गुजर यांची प्रतीक्षा...!!*
*इंग्रज अधिकाऱ्यांकडून सिद्दि ला तोफा आणि दारू गोळ्यांची रसद पुरवतो म्हणून होकार...!!*

MARCH 7

*७ मार्च इ.स.१६४७*
इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवरायांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडा समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
*७ मार्च इ.स.१६४७*
शहाजीराजे यांचे सेवक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.
*७ मार्च इ.स.१६६५*
सिंहगडाखाली मार खाल्लेला महाराजा जसवंतसिंह राठोड पुण्यातच हाय हाय करित बसला होता. त्याने छत्रपती शिवरायांविरूद्ध नंतर एकही पाऊल उचलले नव्हते. मिर्झा राजांना पुण्याचा अम्मल देऊन टाकून जसवंतसिंह याच दिवशी दिल्लीला निघून गेला.
*७ मार्च इ.स.१६८०*
१६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी १५ मार्च रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले होते.

MARCH 8

*८ मार्च इ.स.१६७०*
पुरंदरच्या तहात गमावलेला पुरंदर वज्रगड निळोपंत मुजुमदारांनी छापा घालून मोगलांकडून कब्जा केला. किल्लेदार रसिउद्दिन पंतांच्या हाती पडला. गड फत्ते झाला. ज्या पुरंदरासाठी दिलेरखान व मिर्झाराजांनी जंग जंग अतोनात प्रयत्न केले, आणि तरिही अखेरपर्यंत जो त्यांना मिळाला नाही, तोच पुरंदर निळोपंतांनी २४ तासात काबीच केला.

*८ मार्च इ.स.१५४६*
पोर्तुगीज राजाकडून गोव्याच्या गव्हर्नरला एक फर्मान आले. ते फर्मान असे. 'गोव्यातील हिंदूंच्या मूर्तींचा नाश करा. त्यांची देवळे पाडा. हिंदूंना धार्मिक उत्सव करण्यास बंदी घाला. ब्राम्हणांना गोवे प्रांताबाहेर हाकलून द्या. सरकारी अधिकाराच्या जागा फक्त जे ख्रिस्ती धर्म स्वीकारतील त्यांनाच द्या.'  ह्या फर्मानाची ताबडतोब अंमलबजावणी झाली.

*८ मार्च इ.स.१६८९*
मोगल बादशाह औरंगजेब याने छत्रपती संभाजी राजे यांना कैद केले व त्यानंतर मराठा साम्राज्य सर्वस्वी संपवावे म्हणून आपल्या झुल्फिकारखान नावाच्या सरदाराला फौजेनिशी राजाराम महाराज होते त्या रायगड किल्ल्याला वेढा घालायला पाठवून दिले. दि ८ मार्च १६८९ या दिवशी तो आपल्या सैन्यासह महाड येथे तळ टाकून बसला. पुढील आज्ञेनुसार दि २५ मार्चला त्याने रायगडाला वेढा दिला.

*८ मार्च इ.स.१७३१*
मराठ्यांनी बाजीरावच्या नेतृत्वाखाली निजामाचा सुरतेजवळ पराभव केला.

MARCH 9

*९ मार्च इ.स.१६६८*
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशीही, इंग्रज, सिध्दी, पोर्तुगिज, डच इ. सत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांचे नाव संपूर्ण हिंदुस्थानात गाजत होते. याचमुळे औरंगजेबाने शिवरायांना नाईलाजाने "राजा" ही पदवी बहाल केली.
*९ मार्च इ.स.१६७३*
शिवाजी महाराज ९ मार्च रोजी रायगडाहून निघाले ते पाचाडास आऊसाहेबांचे दर्शन, पोलादपूरास कविंद्र परमानंद यांचे दर्शन घेऊन प्रतापगडमार्गे पन्हाळगड बघण्यासाठी निघाले. 

कोंडाजी फर्जंदाने नुकताच काबीच केलेला पन्हाळगड ! गडावरील मंडळिंनी त्यांना येताना लांबूनच पाहिले व त्यांच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी गडावर गडबड उडाली. गडावर दत्ताजी पंत वाकेनिवीस होते. इतर सर्व मंडळी होती. त्यांची धांदल उडून गेली. महाराज गडावर पोचले. आनंदाचे उधाण आले. दत्ताजी पंतांनी अक्षरशः सोन्याची फुले महाराजांवर उधळून त्यांचे स्वागत केले.
*९ मार्च इ.स.१७४७*
छत्रपती शाहूमहाराजांनी ( राजमंडळातील काही सदस्य व काही सरदार यांच्या ) विरोधामुळे ९ मार्च १७४७ रोजी बाळाजी बाजीराव ( नानासाहेब ) यांना पेशवा पदावरून दूर केले. त्यामुळे ९ मार्च १७४७ ते १३ एप्रिल १७४७ पेशवेपद रिक्त.

MARCH 10

*१० मार्च १६७३*

रायगडाहून पन्हाळगडाकडे जाताना वाटेत शिवरायांचा प्रतापगडावर मुक्काम. *प्रतापगडास भवानी देवीची शोडषोपचारे पूजा*.

*१० मार्च १६७७*
५ फेब्रुवारी १६७७ ते १० मार्च १६७७ या कालावधीतील भागानगर (हैद्राबाद) येथील मुक्काम आटोपून शिवरायांचे दक्षिणदिग्वीजयास्तव दक्षिणेकडे प्रस्थान.
*१० मार्च १६७९*
शिवरायांचे सरदार थोरले आनंदराव यांनी विजापूरकरांकडून बाळापूर जिंकले

MARCH 11

*●  ११ मार्च १६८९*
*छत्रपति संभाजी महाराज बलिदान दिवस ... !!!
*औरंगजेबाच्या कैदेमध्ये असलेल्या छत्रपती संभाजीराजांची अतिशय हालहाल करुन तुळापूर येथे हत्या करण्यात आली.*
*● ११ मार्च १८१८*
*दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात कर्नल प्रौथरने ११ मार्चला कोरीगड़वर हल्ला केला. ४ दिवसांनी दारूकोठार तोफेत नष्ट झाल्याने अखेर मराठ्यांनी शरणागती पत्करली.*
*🚩शिवविचार प्रतिष्ठान🚩*
*११ मार्च इ.स.१६८९*
#छत्रपती_संभाजी महाराज बलिदानदिन औरंगजेबाची अखेरंची सजा मस्तक कलम करा आणि धाकल्या धन्याच मस्तकं छाटलं गेलं भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात शंभूराजांच्या मस्तकाची गुढी उभारंली निघाली वाजत गाजत आली इंद्रायणी-भीमेच्या तीरावरं त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला इंद्रायणीभीमेच्या  पात्रात आणि थरारली इंद्रायणी-भीमा अरे याच इंद्रायणी-भीमेनं पाहिलं होतं ते शौर्य ते धाडसं ते साहसं तो पराक्रम ती ज्वलाज्वलन तेजसनिष्ठा ते धैर्य तो संयम मानवी
जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळलेलं शंभूराजांचे
ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा" शंभूराजांच्या
मस्तकाकडं तिरक्या माना करून आसवं ढाळू
लागल्या गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी-
भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय! खरा "सर्जा
संभाजीराजा" अजुन कळलाच नाही.
" *शिवाजी महाराजांनी सांगितलं...कसं जगावं!!!*
*आणि संभाजी महाराजांनी दाखवल... कसं मरावं*!!!...ती
"इंद्रायणी- भीमा" आजही सांगतेय........
या स्वराज्याच्या धाकल धन्यास त्रिवार मानाचा
मुजरा.

MARCH 12

*१२ मार्च इ.स.१६७३*
कोंडाजी फर्जद यांनी जिंकलेला किल्ले पन्हाळा पाहण्यासाठी छञपती शिवराय आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं पन्हाळ्यावर आगमन.
*१२ मार्च इ.स.१६६४*
सुरतकरांनी कंपनीस एक पत्र पाठविले ते असे शिवाजीची सत्ता व सामर्थ्य वाढत असून सर्वांना त्याचे भय वाटते आज त्याच्या ताब्यात काही नाही तरी आठ नऊ महत्त्वाची बंदरे आली आहेत या प्रत्येक बंदरातून इराण बसरा मक्का या बाजूला त्याची निदान दोन तीन गलबते व्यापारानिमित्त बाहेर पडतात.

या व्यापारार्थ बाहेर पडणाय्रा महाराजांच्या गलबतांना पकडून इंग्रजांना आपल्या वखारीच्या लूटीची भरपाई करुन घ्यायची होती त्यासाठी टपून बसले होते.
शिवरायांनी आता मोठ्या आरमारी स्वारीचा बेत आखला होता. त्याचे नेतृत्व ते स्वतः करणार होते त्यानुसार फेब्रुवारी १६६५ रोजी शिवराय मालवण येथील सिंधुदूर्गाहून ८५ लहान गलबते व ३ मोठी गलबते घेऊन बार्सिलोर
( बसनूर ) वर निघाले त्यांच्या बरोबर ४००० सैन्य होते. बसनूर हे शहर शिवरायांनी लुटले. या स्वारीचे वर्णन सभासद बखरकार करतो - " शहरांचे लोक बेहुशार होते. एकाएकी जहाजांतून मराठे उतरले, शहर मारिले एक दिवस शहर लुटून फन्ना केले. जैशी सुरत मारुन मालमत्ता आणली त्याप्रमाणे बसनूरची मालमत्ता, अगणित माल, जडजवाहीर, कापड जिन्नस घेऊन देशास आले.
*१२ मार्च इ.स.१७०१*
स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराऊसाहेब
बादशहाने जोरदार आक्रमणे सुरु केली. याकाळात ताराराणींनी कुशल युद्धनीतीने मत केली. बादशहाच्या फौजेने वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचा पावसाळा जवळ येईपर्यंत किल्ला लढवायचा व नंतर वाटाघाटी करून रोख रक्कम घेऊन किल्ला बादशहाच्या ताब्यात द्यायचा हि रणनीती वापरली. वेढ्यातल्या सैन्यावर मराठे आक्रमण करतच याचबरोबर धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे मोगली मुलखात धुमाकूळ घालत यांना रोखण्यासाठी बादशहा दाऊदखान, राव डाळपात बुंदेला, शहजादा बेदरबख्तत, जुल्फिरखान यांना पाठवत. औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना म्हणतो एकट्या जुल्फिरखानाला १७०० च्या मोहिमेत २००० कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. सातारा, परळी दोन किल्ले घेतल्यानंतर बादशहा माणदेशात सरकला. पुढे त्याने पन्हाळा-पावनगडास वेढा घातला या परिस्थिती मराठे जोमाने लढत होते. विठोजी केसरकरांनी गडाबाहेर पडून मोर्चा मारल्यानंतर त्यांचे कौतुक करणारे पत्र ताराराणींनी लिहिले त्यातून त्यांनी जिद्द व आत्मविश्वास वाढविला "तुम्ही हमेशा कस्त करून गनिमास नजिता पावविता. एक दोन वेळ मोर्चा मारिला. औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा अशी उमेद धरता, म्हणून हे वर्तमान देवजी रघुनाथ व फडणीस यांनी विदित केले त्यावरून तुमचा मुजरा झाला. ऐसियास तुम्ही एकनिष्ठ सेवक तैसेच राहा. याउपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे. स्वामी उर्जित हरबाब करतील.  दिलासा असो देणे." १२ मार्च १७०१.
बादशहा विशाळगडाकडे येतोय हे समजताच ताराराणी व शिवाजीराजे प्रतापगडावर पोहचल्या. या प्रसंगी ताराराणींनी मराठा सरदार प्रतापराव मोरे यांना लिहलेले एक पत्र उपलब्ध आहे ज्यावरून त्यांचे लढाईचे धोरण, सरदारांशी वागणूक, शत्रूशी लढण्याचा निर्धार दिसून येतो. त्यातील एक वाक्य असे "औरंगजेब विशाळगडास बिलगला याजकरिता त्याचे कविलावाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावेत, तरीच तो बलकुबल राहतो. याजकरिता तुम्ही लोक आपले अवघे एकदील होऊन औरंगजेबास जडून राहणे. तुम्ही स्वामींचे एकनिष्ठ सेवक, मायेचे विश्वासू आहा.

MARCH 13

*१३ मार्च इ.स.१६६५*
मुघल सरदार "मिझाराजा जयसिंग" व
"दिलेरखान" यांनी *"किल्ले पुरंदर"* ला वेढा घातला.

*१३ मार्च इ.स.१६७९*
छत्रपती शिवरायांनी *"दाबोळपूर"* जिंकले.
छत्रपती शिवरायांनी कर्नाटकातील भाग
जिंकण्यासाठी सरनौबत हंबीरराव मोहिते यांना
पाठवले होते सेनापती आनंदराव मकाजी यांनी
जोरदार हल्ला चढऊन दोबाळपुर जिंकून घेऊन तो भाग स्वराज्यात आणला.

१३_मार्च_१६६५
(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू , सोमवार)
स्वराज्य संकटात, मोगली फौजांचा स्वराज्यात धुमाकुळ.
संकटाची मालिका सुरू झाली होती..
कोटीचंडी यज्ञ करून आलेल्या मिर्झाराजे जयसिंग यांच्या परवानगीनंतर मिर्झाराजाच्या फौजानी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली पुरंदरला वेढा टाकला ! आणि सुरू झाला मऱ्हाठयांचा एल्गार !

१३_मार्च_१६७९
मराठ्यांनी युद्धात दाभोळपुर जिंकले.
या मोहिमेत शिवराय स्वतः नव्हते.
छत्रपती शिवरायांनी कर्नाटकातील भाग जिंकण्यासाठी सरनौबत हंबीरराव मोहिते यांना पाठवले होते.
सेनापती आनंदराव मकाजी यांनी जोरदार हल्ला चढऊन दोबाळपुर जिंकून घेऊन तो भाग स्वराज्यात आणला .

१३_मार्च_१७६०
अब्दालीशी_तह
सुभेदार मल्हारराव होळकर कर्तबगारीने शुन्यातून झंजावात उभे करणारा पुरुष.
ज्या काळात स्त्रीयांना गोशाशिवाय शिवाय घराबाहेर पडणे मुश्किल त्या काळात अहिल्यादेवींना शिक्षण-राजनीति-युद्धनीतिचे संस्कार करत त्यांना घडवणारा द्रष्टा पुरुष.
संपुर्ण आयुष्य लढाया करण्यात गेले.
राजकीय मुत्सद्देगिरी कोणालाही चकीत करणारी. वयाच्या पासष्ठाव्या वर्षीही इंग्रजांशीही विजयी झुंज दिली असा हा योद्धा.
पानिपत ही एक शोकांतिका.
पण १३ मार्च १७६० साली अब्दालीशी तह करुन त्याला परत वाटेला लावण्याचे मुत्सद्दी कार्य त्यांनी केले होते.

१३_मार्च_१८००
नाना फडणवीस यांचा मृत्यू
(जन्म १२ फेब्रुवारी १७४२)
पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते.
पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.
बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.
आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला.
इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.


MARCH 14

*१४ मार्च इ.स.१६४९*
शिवरायांनी शहाजीराज्यांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात
अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका
झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड
विजापुरला परत द्यावा लागला.
*१४ मार्च इ.स.१६६५*
छत्रपती शिवाजी महाराज भिवगडावर मुक्कामी होते.
*१४ मार्च इ.स.१७२३*
खानदेशात लांबकानी येथे निजामाच्या फौजांशी
युद्ध करून मराठ्यांच्या फौजासह बाजीराव माळव्यात गेले.
*१४ मार्च इ.स.१७६०*
पानिपत मोहीमेत अब्दालीच्या सैन्यापेक्षाही
पेक्षाही मराठ्यांचा खरा पराभव हा "पाण्याने"
केला. दिनांक १४ मार्च सन १७६० रोजी पडदुर
येथून निघून सदाशिवराव भाऊसाहेब अत्यंत
वेगाने उत्तरेत सरकले.


*१४ मार्च इ.स.१६४९*
शिवरायांनी शहाजीराज्यांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

*१४ मार्च इ.स.१६६५*
छत्रपती शिवाजी महाराज भिवगडावर मुक्कामी होते.

*१४ मार्च इ.स.१७२३*
खानदेशात लांबकानी येथे निजामाच्या फौजांशी युद्ध करून मराठ्यांच्या फौजासह बाजीराव माळव्यात गेले.
*१४ मार्च इ.स.१७६०*
पानिपत मोहीमेत अब्दालीच्या सैन्यापेक्षाही पेक्षाही मराठ्यांचा खरा पराभव हा "पाण्याने" केला. दिनांक १४ मार्च सन १७६० रोजी पडदुर येथून निघून सदाशिवराव भाऊसाहेब अत्यंत वेगाने उत्तरेत सरकले.

*१४ मार्च इ.स.१८१८*
घणगड आणि कोरीगड इंग्रजांच्या ताब्यात
कोरीगड या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला.

MARCH 15 


*१५ मार्च इ.स.१५९४*
मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई(उमाबाई)हिच्या पोटी वेरुळ इथे शहाजी राजे यांचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारात मतभेद आहेत.)

*१५ मार्च इ.स.१६६१*
शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या. 

*१५ मार्च इ.स.१६६५*
मिर्झाराजा जयसिंग व दिलेरखान पठाण यांनी पुण्याहून पुरंदरकडे प्रस्थान केले.

*१५ मार्च इ.स.१६६९*
पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे सामान देवून त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले.

*१५ मार्च इ.स.१६७०*
छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा.

*१५ मार्च इ.स.१६७०*
माहुली गडावर मनोहरदासने शिवरायांचा छापा हेरून मराठ्यांवर हल्ला चढवला व ह्या लढाईत १ हजार मराठे कापले गेले. हि गोष्ट शिवरायांच्या जिव्हारी सलू लागली .

*१५ मार्च इ.स.१६८०*
राजाराम महाराजांची जानकीबाईंशी लग्न
वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई. शिवाजी महाराजांच्या चरित्रातील हे शेवटचे मोठे मंगल कार्य. यानंतर १९ दिवसांनी त्यांचे रायगडावर देहावसान झाले.

*१५ मार्च इ.स.१६८३*
मराठ्यांचा सरदार विठोजी हा ४००० घोडेस्वार घेऊन मुघल सैन्यावर तुटून पडला, तसेच "सरसेनापती हंबीरराव मोहीते" २०,००० घोडेस्वार व १०,००० पायदळ घेऊन कोकणात उतरले. यात हंबीरराव जखमी झाले.

*१५ मार्च इ.स.१७१९*
छत्रपतींनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या.

MARCH 16


*१६ मार्च इ.स.१६६१*
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून .... मराठे पुन्हा नगरमध्ये घुसले व त्यांनी तेथील ५१ गावे लुटली.
*१६ मार्च इ.स.१६६२*
मराठ्यांचा मुघल फौजेवर  हल्ला.
*१६ मार्च इ.स.१६७३*
शिवाजी महाराज ९ मार्च रोजी रायगडाहून निघाले ते पाचाडास आऊसाहेबांचे दर्शन, पोलादपूरास कविंद्र परमानंद यांचे दर्शन घेऊन प्रतापगडमार्गे पन्हाळगड बघण्यासाठी निघाले. 

कोंडाजी फर्जंदाने नूकताच काबीच केलेला पन्हाळगड ! गडावरील मंडळिंनी त्यांना येताना लांबूनच पाहिले व त्यांच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी गडावर गडबड उडाली. गडावर दत्ताजी पंत वाकेनिवीस होते. इतर सर्व मंडळी होती. त्यांची धांदल उडून गेली. महाराज गडावर पोचले. आनंदाचे उधाण आले. दत्ताजी पंतांनी अक्षरशः सोन्याची फुले महाराजांवर उधळून त्यांचे स्वागत केले. दक्षिण दरवाजावरील भालदारांनी ललकार्‍या दिल्या. गडावरचे झाडून सारे स्त्रीपुरूष त्यांचे उत्साहाने स्वागत करीत होते व दर्शन घेत होते. नंतर महाराजांनी संबंध गडाचे अति प्रेमभराने दर्शन घेतले. कोंडाजी फर्जंदाचे व गड जिंकणार्‍या सर्व चित्त्यांचे त्यांनी मनःपूर्वक कौतूक केले. त्यांना सर्वांना खूप खूप धनदौलत देऊन त्यांची पाठ थोपटली. त्यांची धाडसी करामत पाहून महाराजांना धन्य धन्य वाटले अन् असा मायावंत राजा मायभवानीने आपल्याला दिला म्हणून त्यांही सर्वांस धन्य धन्य वाटले.
*१६ मार्च इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांच्या पत्नी “काशीबाई साहेब” यांचा किल्ले रायगडावर देहवास.

MARCH 17


*निराजी रावजी* शिवरायांच्या प्रथमच्या साह्यकारी मंडळींपैकीं एक; हा आगर्‍यास शिवरायांच्या बरोबर गेले होते व कैदेंतही पडले होते  (१६६६). तेथून सुटल्यावर त्यांनी मथुरेस मोरोपंत पेशव्याच्या मेहुण्याकडे शंभुराजांची व्यवस्था लावून दिली. दक्षिणेंत आल्यावर महाराजांनी त्यांना मोठें बक्षीस दिलें व औरंगाबादेस मोंगलाकडे वकील म्हणून ठेवले. नंतर गोवळकोंडेकरानें *छत्रपतींना* खंडणी देण्याचें कबूल केल्यावर त्याच्या दरबारी निराजीपंतास वकील ठेवले(१६६९). पुढें त्यांना न्यायाधीश करण्यांत आलें. हे मुत्सद्दी असल्यानें याची नेमणूक पुन्हां कुतुबशहाच्या दरबारी वकिलांच्या कामावर झाली (१६७८). त्यानंतर हे थोड्याच दिवसांनीं वारले 
यांचाच मुलगा *प्रल्हादपंत* होय.

*१७ मार्च इ.स.१६३१*
शहाजीराजांनी अॉगस्ट १६३० मध्ये मोगलांची नोकरी पत्कारली. दि. १७ मार्च १६३१ रोजी त्यांची नेमणूक नाशिकचे लष्करप्रमुख म्हणून झाली. मोगलांच्या अन्यायी वागणुकीमुळे अॉक्टोबर १६३१ त्यांची नोकरी सोडून ते निजामशाहीत सामील झाले. आठ वर्षाच्या मुर्तुजा निजामशहाला मांडीवर बसवून त्यांनी इ.स. १६३१ ते इ.स.१६३६ पर्यंत स्वतंत्र कारभार केला.

*१७ मार्च इ.स.१६४९*
आदिलशाही सरदार अफझल खान  अटक केलेल्या शहाजी राजेंना घेऊन विजापूरात दाखल झाला.

*१७ मार्च इ.स.१६६७*
मुसलमान झालेल्या "नेतोजीस" पंचहजारी मनसबदारी बहाल.

*१७ मार्च इ.स.१६७९*
कर्नाटक मोहिमेवर महाराज असताना सरनौबत हंबीरराव मोहिते मोरोपंत पेशव्यांनी कोप्पळ जवळील तंगभद्रा नदी काठावरील बहादरपुर किल्ल्याला जोरदार हल्ला चढवून तो जिंकून घेतला. यामुळे पन्हाळा प्रांतापासुन जिंजी पर्यंतची सलग भूमी स्वराज्यात दाखल झाली.

*१७ मार्च इ.स.१६८३*
मोगलांशी सामना करण्यास "सरसेनापती हंबीरराव मोहिते" कल्याण-भिवंडीत उतरले.

*१७ मार्च इ.स.१८६३*
दिन दलितांचे कैवारी महाराज सयाजीराव गायकवाड यांचा स्मृतिदिन
नाशिक जिल्ह्यातील कवळाणे या गावी जन्मलेले गोपाळ काशीराम गायकवाड, बडोद्याचे महाराजा खंडेराव गायकवाड यांच्या मृत्यूनंतर बडोद्यामध्ये दत्तक म्हणून गेले. पुढे ते महाराजा सयाजीराव गायकवाड नावाने उदय यास आले.
सयाजीराव एक प्रजाहितदक्ष, आदर्श, लोककल्याणकारी राजा होते. त्यांनी आपल्या छोट्याश्या संस्थानात विविध सामाजिक सुधारणा केल्या. काळाच्या पुढे असणारे राजे म्हणून त्यांनी लौकिक संपादन केला. सयाजीरावानी न्यायव्यवस्थेत सुधारणा केली, ग्रामपंचायतीचे पुनरुज्जीवन, सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय, गरीब, गरजू विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण व कला शिक्षणाची सोय, संस्कृत ग्रंथ प्रदर्शन, दलितांसाठी शाळा, अस्पृश्यता निवारण याचबरोबर स्त्रियांना वारसा हक्क, बालविवाह बंदी, विधवा विवाह, कन्या विक्रीय बंदी अशा असंख्य सुधारणा त्यांनी घडवून आणल्या आणि आपल्या संस्थानात स्त्रीमुक्तीची पहाट घडवून आणली. प्रगाढ विचारवंत आणि अत्यंत पुरोगामी असणाऱ्या या राजाने राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थानही भूषविले. १८८६ साली एका समारंभात सयाजीरावानी मुंबई येथे ज्योतीराव फुलेना महात्मा ही पदवी बहाल केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती आणि नोकरीही दिली. अशा या लोकमंगल राजाचे ६ फेब्रुवारी १९३९ साली निधन झाले. 

*१७ मार्च, इ.स.१८८४*
शाहू महाराजांचा जन्म जून २६ , इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २ , इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.

MARCH 18 


*१८ मार्च इ.स.१६७९*
शिवरायांनी बहाद्दुरबिंडा किल्ला जिंकला.
*१८ मार्च इ.स.१६८०*
आदीलशाही सरदार सर्जाखान यास विजापूरच्या आदीलशाही सेनेचा मुख्य सेनापती केले.
*१८ मार्च इ.स.१६८८*
हरजीराजे महाडिक त्रिणामल्लीहून कंचीवर गेले.
*१८ मार्च इ.स.१७७३*
मराठ्यांनी किल्ले रायगड ताब्यात घेतला, त्यावेळी रायगडचा वापर उत्कृष्ट तुरंग म्हणून केला. रायगड घेऱ्यातील किल्ले लिंगाण्याचा ही तुरूंग म्हणून वापर करीत असत.
*१८ मार्च इ.स.१७६०*
चैत्री पाडाव्याच्या शुभ मुहूर्तावर राजमाता जिजाऊंचे माहेरघर सिंदखेदराजा येथून सदाशीव भाऊ यांनी आपल्या सहकार्यांसह उत्तरेकडे प्रयाण केले. त्यावेळी ५० हजारांची फौज सोबत होती. शिंदे-होळकर मार्गात मिळणार होते. अहमदशाह अब्दाली याच्या आक्रमणापासून दिल्लीच्या पातशाहीचे रक्षण करण्यासाठी मराठे युद्धाला निघाले.

MARCH 19 

*१९ मार्च इ.स.१६४६*
छत्रपती शिवाजी महाराजांनी व आईसाहेब जिजाबाई यांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर कसबा गणपतीचे देऊळ बांधले, त्या पुण्यातल्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला.

*१९ मार्च इ.स.१६७०*

शिवरायांनी त्रिंबक भास्करांना पुरंदरचे किल्लेदार नेमले.
निळोपंत मुजूमदारांनी पन्हाळा पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला .यामुळे राजारामाच्या जन्माचा पायगुण स्वराज्यात चांगलाच लाभदायक ठरला.खांसा मोगली किल्लेदार शेख राझीउद्दिनला निळोपंतानी कैद केले.यास्तव महाराजांनी त्रिंबक भास्काराना पुरंदरचे नवे किल्लेदार म्हणून नेमले .

*१९ मार्च इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांची धाकट्या पत्नी काशीबाईसाहेब यांचा रायगडावर मृत्यू.

*१९ मार्च इ.स.१६८०*
ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र
अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती.
ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली त्यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता.

*१९ मार्च इ.स.१७५४*
मल्हारराव होळकरांचा एकुलता एक पुत्र व अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू.

MARCH 20 


*२० मार्च इ.स.१६६६*
छत्रपती शिवाजी महाराज #संभाजीनगर येथे दाखल झाले.
*२० मार्च इ.स.१७१९*
#तीन_दशकानंतर_मराठ्यांनी_राजमाता_येसूबाई_कैदेबाहेर_पडल्या
मातापुत्र प्रदीर्घ वियोगानंतर एकमेकांस भेटले.
एकेकाळी औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या आपल्या पुत्राचे राज्य कलेकलेने वर्धिष्णू होत चालल्याचे, मराठ्यांचे निशाण नर्मदापार गेलेले पाहण्याचे भाग्य या येसूबाईंना लाभले.
छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या.
*२० मार्च इ.स.१६६६*
"मिर्झाराजे जयसिंग" यांच्या सांगण्यावरून आणि स्वराज्याचे योग्य राजकारण साधण्यासाठी सरसेनापती "नेताजी काका पालकर" मुघलांना सामील झाले.
*२० मार्च इ.स.१७३९*
नादिरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली.

MARCH 21

*२१ मार्च इ.स.१६५७*
छत्रपती शिवरायांनी 'गुंजन मावळ' चे वतनदार 'शिळमकर' यांचा वतनाचा तंटा लाल महाल -पुणे येथे सोडवला.

*२१ मार्च इ.स.१६५७*
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे सरनोबत म्हणून 'नूरखान बेग' यांना सन्मान व सैन्याचे नेतृत्व करण्याचे फर्मान लाल महाल -पुणे येथून दिले.

*२१ मार्च इ.स.१६८०*
शिवरायांनी कुलाबा उर्फ़ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरु केली. तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते.
या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
ह्यानंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले

*२१ मार्च इ.स.१६६७*
किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील..!
किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून .शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली समुद्राला नारळ अर्पण केला.सिद्दी आणि हबशांच्या जोरावर त्यांना उत्तर म्हणून शिवरायांनी भर समुद्रात शिवलंका उभी केली.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग 
आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.

MARCH 22


*२२ मार्च इ.स.१६६०*
छत्रपती शिवराय पन्हाळा वेढ्यात असताना याच वेळी केदारजी खोपडे देसाई व ईतर देशमुखांना आदीलशहाने आदीलशाहीस मदत करन्याचे पत्र पाठवले.
*२२ मार्च इ.स.१६८०*
शिवराय ज्वराच्या व्यथेने आजारी पडले महाराज दक्षिण दिग्विजय प्राप्त करून रायगडी परत आले होते.रामराजांचा व्रतबंध व विवाह पार पडला होता .शंभुराज्यांच्या दिलेरखानाच्या प्रकरणामुळे प्रपंचाची आसक्ती संपली होती .सूर्यग्रहणाचे पर्व आटोपले होते .दोनच दिवसांनी महाराज रायगडी ज्वराच्या(तापेच्या) व्यथेने आजारी पडले .
आजार बळावत चालला होता .
*२२ मार्च इ.स.१६८२*
तब्बल पाच वर्षे मराठ्यांची झुंज
औरंगजेब बादशहा औरंगाबदेला पोचला आणि वेळ न दवडता लढाईचे मनसूबे आखु लागला. त्याने लढाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बादशाहला वाटले होते की अगदी थोड्याच अवधित मोघली फ़ौज मराठ्यांचा हा मुलुख काबिज करील आणि म्हणुनच त्याने आधी मराठ्यांचे किल्ले घेण्याचे ठरविले.
त्याने शहाबुद्दीन फिरोजजंग याला रामसेज किल्ला जिंकण्यासाठी रवाना केले. शहाबुद्दीखान सोबत शुभकर्ण बुंदेला - रतनसिंह हे पितापुत्र, दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते. तर रामसेजच्या किल्लेदाराची शिबंदी होती केवळ ५०० मराठ्यांची !
संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहबुद्दीखान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो कि पळो करून सोडले. किल्ल्याला सुरुंग लावणे. मोर्चे बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानाने लाकडी धाम्धामे (बुरुज) उभे करून त्यावरून किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरु केला. पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाचे सगळे मनसुबे उधळून लावले. किल्ल्यावरचे मराठे शरण येत नाहीत हे कळताच औरंजेबाने कासिमखानाला शहाबुद्दीन खानाच्या दिमतीला पाठवले. किल्ल्यावरची अल्प शिबंदी एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्याला किती काळ टक्कर देणार? शहबुद्दीनखानाचा वेध मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले. शहाबुद्दीन खानाच्या तोफा गडाच्या बुरुजावरील दरवाजावर एकसारख्या आग ओकू लागल्या. भिंत कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले. वेढा उठवण्यासाठी रुपाजी भोसले रामसेजच्या पायथ्याशी येऊन मोगलांना भिडले. घनघोर युद्धाला तोंड फुटले. करणसिंह या मोगली सरदारावर त्वेषाने तुटून पडलेले रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले
इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला. त्याने मोर्चे लावले आणि लाकडी धमधमा (बुरुज) उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारखा गोळ्यांचा मारा करू लागला. इतक्यात वेढा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्यांनी मोगलांवर एकच हल्ला केला. किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खानची प्रचंड मोठी हानी झाली आणि गुडघे टेकून त्याने माघार घेतली. संतापलेल्या औरंजेबाने शहाबुद्दीन खानाला माघारी बोलवून त्याजागी बहादुर खानाची नेमणूक केली. १५,००० फौजेनिशी बहादुरखानाने रामसेजला विळखा घातला होता. मराठे आणि मोगल एकमेकांचे हल्ले चुकवून आपल्या सैनिकांना रसद पुरवत होते. शरीफखान नावाचा मोगली अधिकारी बहादुरखानाला रसद पुरवण्यासाठी निघाला होता. ७००० मराठे एकाचवेळी त्यावर तुटून पडले आणि त्यांनी जाहीरखान फैजुल्लाखान अशा अनेक सरदारांना कापून काढले. मोगलांची जबरदस्त पिछेहाट झाली. 
मराठ्यांच्या शौर्याला कोणतीही माया लागू होत नाही हे पाहून बहादूर खानाने एक योजना आखली. एका बाजूने लढाईची तयारी चालू आहे असे दाखवायचे. किल्ल्याच्या या बाजूला दारुगोळा, तोफखाना आणि मोगल सैन्याची हालचाल दाखवून मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि दुसऱ्या बाजूने कोणतीही चाहूल लागू न देता निवडक सैन्याने गडावर चढायचे असा बेत आखला. सावध असलेल्या रामसेजच्या किल्लेदाराने बहादुरखानाचा हा डाव  अचूक ओळखला. ज्या बाजूने मोगल किल्ल्यावर हल्ला चढवायचे भासवत होते तिथे मराठा किल्लेदाराने नगारे, नौबती, कर्णे अशा रणवाद्यांचा कल्लोळ सुरु केला. किल्ल्यावरून खाली दगडांचा मारा सुरु झाला. तेलाने पेटवून माखलेले कपडे पेटवून खाली फेकण्यात येऊ लागले आणि दुसरीकडे बहादूर खानाचे सैन्य ज्या बाजूने वर चढणार त्या ठिकाणी सशस्त्र मावले दबा धरून बसले.    बहादूर खानाचे बेसावध मोगली सैनिक गडावर पाय ठेवतात न ठेवतात तोच ते मराठ्यांच्या तलवारीचे बळी ठरले. मोगली सैनिकांच्या किंकाळ्या आसमंतात दुमदुमल्या आणि वरून कोसळणाऱ्या सैनिकांमुळे खालून वर चढणारे हि थेट खाली आपटले. किल्लेदाराने बहादूर खानची चांगलीच फजिती केली.
बहादूर खानाने वेढा उठवण्याची तयारी सुरु केली, बादशहाच्या हुकुमानुसार खाली मान घालून तो परत फिरला. किल्ल्यावर मोर्चे बांधण्यासाठी व चढाई करण्यासाठी त्याने प्रचंड लाकडे साठवली होती. ती सगळी लाकडे त्याने परत जाताना पेटवली. पण बादशहाची हौस अजून फिटली नव्हती म्हणूनच त्याने कासीमखान किरमाणी या सरदाराची या वेढ्यासाठी नियुक्ती केली. पण तरीही रामसेज झुकला नाही. मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचे चटके कासीम खानाला सहन झाले नाहीत. सगळे वार झेलून आणि सगळे हल्ले परतवून रामसेजच्या बालेकिल्ल्यावर भगवा जरीपटका अजूनही डौलाने फडकतच होता. रामसेजचा तो किल्लेदार म्हणजे मूर्तिमंत शौर्याचा धगधगता आविष्कार, त्या नररत्नाच नाव दुर्दैवाने आजही इतिहासालाच्या पानात सापडत नाही हे दुर्दैव. त्याच्या विलक्षण धैर्याचा आणि अतुलनीय शौर्याचा मनाचा पोशाख, रत्नजडित कडे आणि रोख रकमेचा पुरस्कार देवून म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या एका प्रमुख किल्ल्यावर केली आणि रामसेज वर दुसरा किल्लेदार नेमण्यात आला. किल्लेदाराच्या आणि मराठ्यांच्या हातून घडलेल्या या अद्वितीय पराक्रमाची किंचित सुद्धा जाणीव त्यांना स्वतःला नव्हती. राजपूत, शिख, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि अश्या अनेक शत्रूंच्या राजधान्या काही दिवसात खालसा करणाऱ्या या मोघली फौजेला अर्ध्या दशकाहुन अधिक काळ नुसत्या रामसेजने झुंजवले.
*२२ मार्च इ.स.१७३९*
नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली
*२२ मार्च इ.स.१७५५*
इंग्रज व पेशवे तह. यावरुन इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच तुळाजी आंग्रेवर ( शिवरायांच्या किल्ले सुवर्णदुर्ग ) वर चाल करण्यासाठी मुंबईहून गेले.  तुळाजी जुमानत नाही म्हणुन स्वतः पेशवेच आपल्या आरमाराच्या जिवावर उठले.

MARCH 23

२३_मार्च_१६६०
संकटाची मालिका...!
स्वराज्याचा फास आवळत चालला होता आदिलशाहीने सर्व देशमुख, वतनदारांना केदारजी खोपड्याच्या मदतीने कौलनामे पाठवून मदत करण्याची विनंती पत्रे लिहली.
मोघलांकडून शाहिस्तेखान फास आवळत चालल होता.
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले असताना लोभाने आपलेच लोक फुटून शिवरायांना साथ न देता यावनाना जाऊन मिळत होते.
राजमाता जिजाऊ साहेब स्वतः स्वराज्याचा डोलारा सांभाळत होत्या, यातून सुटनेही अवघड होऊन बसले.

२३_मार्च_१६८२
औरंगजेबासोबत त्याचे ३ पुत्र, नातू व सर्व मोठे सेनाध्यक्ष दक्षिणेत गोळा झाले होते,
बुर्हाणपुरास त्यांची पुढची व्यवस्था करून २३ मार्च रोजी बादशाहा औरंगाबादेस पोहचला.

*२३ मार्च इ.स.१६७४*
छत्रपती शिवरायांची विजापूरी पेठ संपगांव वर स्वारी

*२३ मार्च इ.स.१६७८*
आॅक्टोबर १६७६ मध्ये छत्रपती शिवरायांनी "दक्षिण दिग्विजय मोहीम" साठी प्रस्थान ठेवले होते. जाताना शिवरायांनी प्रभावळीचा कारभार आपले थोरले पुत्र युवराज शंभूराजेंकडे सोपवला होता.
याच काळात शंभूराजांनी आजच्या दिवशी "शृंगारपूर" येथे स्वतास कलशाभिषेक करवून घेतला. यावेळेस शंभूराजेंसोबत होते कवी कलश आणि स्वराज्याचे काही निवडक विश्वासू सहकारी.

*२३ मार्च इ.स.१९३१*
भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी पुकारलेल्या लढ्यात आज भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना इंग्रजांनी फासावर चढविले आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या ३ तरूण क्रांतीकारकांनी बलिदान दिले. हुतात्मा भगतसिंग हे तुरूंगात असताना त्यांनी स्वता लिहीलेल्या "मेरा रंग दे बसंती चोला" या गीतामध्ये छत्रपती शिवरायांचा उल्लेख होता.
हुतात्मा भगतसिंग हे "महाराणा प्रताप" व "छत्रपती शिवराय" यांच्या कर्तुत्वाने व विचारांनी प्रेरीत होते.

MARCH 24


*२४ मार्च इ.स.१३०७*
देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.

*२४ मार्च इ.स.१६७५*
छत्रपती शिवराय वेलवड्यास मुक्कामी.

*२४ मार्च इ.स.१६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
२४ मार्च १६७७ ते एप्रिल १६७७ या काळात छत्रपती शिवरायांचा आंध्रप्रदेश येथील 'श्री शैल्य मल्लिकार्जुन' येथे मुक्काम. भाग्यनगरपासून काही अंतरावर असलेल्या आणि कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपूर' असे नाव असून तिथे छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार घेतलेले दगडातले कोरीव शिल्प उपलब्ध आहे.

*२४ मार्च इ.स.१६७४*
रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. इंग्रजांच्या वतीने तहाची बोलणी करायला नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुभाषा मुंबईहून रायगडाकडे निघाला. २४ मार्च १६७४ रोजी तो न्यायाधीश निराजीपंतांची भेट घेण्यासाठी पाचाडला आला.

MARCH 25

*२५ मार्च इ.स.१६७०*
छत्रपती शिवरायांची चांदवडवर स्वारी.

*२५ मार्च इ.स.१६७५*
'जाॅन चाईल्ड' या इंग्रज अधिकाऱ्याने छत्रपती शिवरायांची भेट घेतली.
नोट: जॉन चाईल्ड हा बॉंबे चा राज्यपाल म्हणून इंग्रजांनी पाठवला होता
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
*२५ मार्च इ.स.१६८९*
मुघलांनी छत्रपती संभाजीराजेंना कैद केल्यानंतर मुघल सरदार 'झुल्फीकारखान' याने मराठ्यांची राजधानी 'किल्ले रायगड' ला वेढा घातला. याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला. रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह राजाराम यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले. वाटेत विशाळगडावर ताराबाई,राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
*२५ मार्च इ.स.१७५७*
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

MARCH 26



*२६ मार्च इ.स.१६६७*
औरंगजेब बादशहाने 'मिर्झाराजा जयसिंग' यांची दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली.
आणि 'शहजादा मुअज्जम' ला दक्षिणेचा नविन सुभेदार नेमले.
*२६ मार्च इ.स.१६७५*
छत्रपती शिवराय किल्ले रायगडहून कुडाळकडे रवाना.

MARCH 27 

*२७ मार्च इ.स.१६४३*
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली.

*२७ मार्च इ.स.१६५२*
#शिवतेज_दिन - #शाईस्तेखानाचा_बिमोड...
दस्तुरखुदद आलमगीराचा 'मामा' व मुघल सेनेतील 
मातब्बर सरदार असलेल्या शाईस्तेखानाची शिवरायांनी "गनिमी कावा" या रणनीतीने पुण्यातील लालमहाल येथे 
तळ ठोकुन बसलेल्या अंदाजे दिड लाखाच्या सैन्यात घुसुन रातोरात बोटे छाटली. या असल्या गनिमी छाप्याचे दुसरे उदाहरण जगात नाही. खान व त्याच्या कुटुंबाने महाराजांची जबर धास्ती घेतली. पुणे व परीसरातील लुट व गाईंच्या कत्तली सर्व बाहेर पडल्या. त्याची बेगम रात्रीचीच "शिवाजी आला शिवाजी आला"म्हणुन ओरडत असे. पुढे औरंगजेबाने बोटे तुटलेल्या मामाला ईराणला पाठवुन दिले.

*२७ मार्च इ.स.१६६७*
मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. आजच्या दिवशी नेताजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले. नेताजी पालकरांचे ‘मुहंमद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले.
जून १६६७ ला औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी पालकर यांना काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले, लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. बाटून ९ वर्षे उलटल्यानंतर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.
१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.

MARCH 28

*२८ मार्च इ.स.१६७०*
आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उठवलेल्या वादळी झंझावाताला रोखण्यासाठी औरंगजेबाने मुघल सरदार दाऊदखानला दख्खनमध्ये पाठवले. आजच्या दिवशी दाऊदखान फौजफाटा घेऊन नगरला पोहोचला.

*२८ मार्च इ.स.१६७०*
मराठा फौजेचा माहुली गडावर ताबा.

*२८ मार्च इ.स.१७३७*
बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
मे १७३६ मध्ये दिल्लीच्या बादशहाकडून अनेक किल्ले, जहागिर्‍या आणि पन्नास लक्ष रुपये मिळण्याचा तह झाला पण तो पुरा न झाल्याने २८ मार्च १७३७ रोजी पेशव्यांनी थेट दिल्लीवर धडक मारून दुसर्‍या दिवशी रामनवमीस यात्रा लुटली.

MARCH 29

MARCH 30

MARCH 31

APRIL 1

APRIL 2

APRIL 3

APRIL 4

APRIL 5

APRIL 6

APRIL 7

APRIL 8

APRIL 9

APRIL 10

APRIL 11

APRIL 12

APRIL 13

APRIL 14

APRIL 15

APRIL 16

APRIL 17

APRIL 18

APRIL 19

APRIL 20

APRIL 21

APRIL 22

APRIL 23

APRIL 24

APRIL 25

APRIL 26

APRIL 27

APRIL 28

APRIL 29

APRIL 30

APRIL 31

MAY 1

MAY 2

MAY 3

MAY 4

MAY 5

MAY 6

MAY 7

MAY 8

MAY 9

MAY 10 

MAY 11

MAY 12

MAY 13

MAY 14                 

MAY 15

MAY 16

MAY 17

MAY 18

MAY 19

MAY 20                                                                                                       

MAY 21

MAY 22

MAY 23

MAY 24

MAY 25

MAY 26

MAY 27

MAY 28

MAY 29

MAY 30

MAY 31

JUNE 1

JUNE 2

JUNE 3

JUNE 4

JUNE 5

JUNE 6

JUNE 7

JUNE 8

JUNE 9

JUNE 10

JUNE 11

JUNE 12

JUNE 13

JUNE 14

JUNE 15

JUNE 16

JUNE 17

JUNE 18

JUNE 19

JUNE 20

JUNE 21

JUNE 22

JUNE 23

JUNE 24

JUNE 25

JUNE 26

JUNE 27

JUNE 28

JUNE 29

JUNE 30

JUNE 31

JULY 1

JULY 2

JULY 3

JULY 4

JULY 5

JULY 6

JULY 7

JULY 8

 *🚩शिवदिनविशेष🚩*

 *८ जुलै इ.स.१६६१*

छत्रपती शिवरायांनी काल रत्नागिरी जिल्ह्यातील श्रींगारपुरचा काही भाग आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा काही भाग जिंकल्यावर आज ते किल्ले वासोटा(व्याघ्रगड) आणि सोनगड जिंकण्यासाठी निघाले.

४२६७ फूट उंचीचा वासोटा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील वासोटा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोऱ्यात, रानात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’ ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ‘आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ‘व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे. 

JULY 9

*शिव दिनविशेष*

*९ जूलै इ.स.१६५४*

*नेताजी पालकर* यांचा पहिल्यांदा स्वराज्याच्या अग्निकुंडातला पहिला उल्लेख आढळतो तो *निळोपंताकडून*.पुरंदर घेण्यावेळी त्यापुढे १६५४ साली पुरंदरची किल्लेदारी  *नेताजी पालकरांकडे* सोपवली.नेताजींच्या मृत्यूबद्दल इतिहासात पक्की नोंद आढळत नाही *नेताजी पालकर* यांचा मृत्यू सध्याच्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे झाला आहे.नेताजी पालकर यांची समाधी तामसा (तालुका .हदगाव, जि.नांदेड) येथे आहे.

JULY 10

JULY 11

 

शिवकालीन दिनविशेष*
*११ जुलै इ.स.१६५९*
अफझलखानाशी सामना करण्यासाठी "छत्रपती शिवराय" राजगडाहून प्रतापगडावर गेले.
स्वराज्याच्या भूमीवर युद्ध होऊन स्वराज्याच्या भूमीचे हाल होऊ नयेत म्हणून स्वराज्याच्या बाहेर महाराज अफझलखानास सामोरे गेले.
आणि अतिशय घनदाट झाडीच्या अशा जावळीच्या खोऱ्यातील "किल्ले प्रतापगड" भेटीसाठी निवडला.
*किल्ले प्रतापगड* :-
छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेल्या पराक्रमाच्या यशोगाथा आपण इतिहासात वाचत आलो आहोत. या यशोगाथा आज देखील महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची आणि त्यांच्या गनिमीकाव्याची आठवण करून द्यायला पुरेश्या आहेत.

महाराजांनी केलेल्या पराक्रमावर अनेक कवनं, ओव्या, गीतं, पोवाडे रचल्या गेले, ते ऐकतांना अंगावर शहारे येतात आणि त्यावेळी महाराजांनी तो प्रसंग कश्यापद्धतीने निभावून नेला असेल या कल्पनेत आपण ध्यानमग्न होतो. प्रतापगडावरील महाराजांची आणि अफजलखानाची भेट देखील इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्यात आली आहे. त्या भेटीवर पोवाडे देखील गायले गेले आहेत.
महाराज आणि अफजलखान या दोघांच्या भेटीचा साक्षीदार ठरलेला प्रतापगड आज देखील त्या जाज्वल्य स्मृती आपल्या हृदयात साठवून दिमाखात उभा आहे. सातारा जिल्ह्यात असलेला प्रतापगड गिरिदुर्ग प्रकारातील गड असून सह्याद्रीच्या रांगांमध्ये जावळीच्या खोऱ्यात घनदाट जंगलात प्रतापगड हा किल्ला बांधला आहे
प्रतापगडावर छत्रपती शिवरायांनी स्वतः बांधून घेतलेले पुरातन शिव मंदिर आहे. किल्ल्याचे खोदकाम करतांना हे शिवलिंग सापडल्याचे सांगितले जाते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराजांनी शिवलिंगाची स्थापना केली होती. आज प्रतापगडाचे नाव उच्चारताच आठवते ती महाराजांची आणि अफजलखानची ऐतिहासिक भेट. प्रतापगडाचे ऐतिहासिक महत्वं देखील या घटनेमुळेच वाढले. ई.स. 1659 साली झालेल्या या भेटीची नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी करण्यात आली आहे. मोठ्या चतुराईने, धाडसाने, शौर्याने महाराजांनी अफजलखानाचा वध केला.

                                                               

JULY 12

 *शिवकालीन दिनविशेष*

*१२  जुलै इ.स.१६६०* 

*"वीर शिवा काशिद बलिदान दिन"* पन्हाळगडाला "सिद्दी मसूद" याने घातलेल्या वेढ्यातून निसटण्यासाठी "शिवा काशिद" नावाचा मावळा हा छत्रपती शिवरायांचा पेहराव करून पालखीतून निघाला.

पण तो पकडला गेला आणि ठार झाला. नावाने "शिवा काशिद" असणारा हा मावळा मरताना "शिवाजी राजा" म्हणून मारला गेला.

यासारखं मोठ भाग्य ते काय!

धन्य तो *"वीर शिवा काशिद".*

१२ जुलै १६६० ची रात्र होती. 

दोन पालख्या तयार केल्या. शिवा काशीद निर्धाराने एका पालखीत आणि शिवराय दुसऱ्या पालखीत बसले. शिवरायांची पालखी अडचणीच्या वाटेने निघाली आणि शिवा काशीदची पालखी पन्हाळगडाच्या मुख्य दाराने निघाली. शिवराय निसटले, अशी ओरड होताच जौहरच्या सैनिकांनी रातोरात शोधाशोध सुरू केली. त्यांना एक पालखी पळविताना दिसली. त्या पालखीला पकडले व पडदा बाजूला केला..शिवा काशीद हा हुबेहुब शिवरायासारखा दिसत होता. त्यामुळे सिद्दि जोहरला वाटले कि हाच शिवाजी ! म्हणुन त्याने व त्याच्या सरदारांनी शिवा काशीदला पकडले व हे शिवराय नाहीत असे कळताच जोहर म्हणतो कसा ‘शिवा काशीद आता तु मरणाला तयार हो’.ते ऐकुन शिवा काशीद म्हणाला ‘शिवाजीराजे आता सुखरुप् वेढयातुन सुटले असतील. आता मी सुखाने मरण्यास तयार आहे’.तसेच शिवरायासाठी हजारदा मरण्यास मी सुखाने तयार आहे’. हे ऐकुन जोहरने त्याचे शिर कापुन टाकले आत शिवा काशीद पालखीचा गोंडा धरून रुबाबात बसलेला. मात्र, ते शिवराय नसून शिवा काशीद आहे हे लक्षात येताच सिद्दी जौहरने शिवा काशीदच्या छातीत समशेर खुपसली. स्वराज्यासाठी शिवा काशीद यांनी असे अतुलनीय बलिदान केले. वीर शिवाजी काशीद यांना त्रिवार मानाचा मुजरा...

JULY 13

 *शिवकालीन दिनविशेष**

*12 व 13 जुलै 1660*

*#कथा_पावनखिंड _रणसंग्रामाची* कालची रात्र, खलबतखान्या मध्ये महाराज खासे मंडळींची बैठक झाली. सगळे निघुन गेले.

ढगांचा कडकडात,चमकणार्या विजा आणि पाऊस या शिवाय कोणी नव्हते.

बाजी बांदल, रायाजी बांदल तीन दरवाजाकडे माळावर गेले. बांदलांच्या त्या सेनेच्या तळात येऊन बाजी बांदलांनी सुचना केली, सारी बांदल सेना भोवतीने गोळा झाली. बाजी बांदलांनी ६०० बांदलांची निर्भिड,रग्गड अशी सेना निवडली. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे या बांदल सेनेचे सेनापती म्हणून त्यांना सुचना करत होते अन् सेना शांतपणे त्या सुचना ध्यानी ठेवत होती कारण प्रसंग खुप अवघड होता तो निभावाऊन न्यायचाच होता ” मरण आल तर बेहत्तर पण आमचा पोशिंदा निसटला पाहीजे या मगरमिठीतुन”

इकडे महाराज आणि नेबापुरचा निडर सेवक शिवा काशीद यांच्यात मसलत चालली होती. राज्यांच्या मनाला बोचत होत पण पर्याय नव्हता. शिवाला पण माहीत होत ”राजा निसटला पाहीजे, राजासाठी लाख वेळा मरण आल तरी बेहत्तर”

रात्र सरली गुरूपौर्णिमेचा दिवस उजाडला. पन्हाळ्यावर काहींना कळाल होत काहींना कळायच राहिल होत आज राजाला निरोप द्यायचा आहे राजाला सुखरूप बाहेर काढायच आहे. महाराजांनी किल्लेदार-गडकर्यांना सुचना दिल्या ”जोपर्यंत गड झुंजता ठेवता येईल तोपर्यंत गड झुंजवा,जीव राखा माणुस वाचवा” गड चोख करण्यात आला.

इकडे ६००रणधुरंदर हातात नंग्या तलवारी घेऊन,कमरेला गोफणी बांधुन तयार,फक्त महाराजांच्या सुचनेची वाट बघत होते.

महाराजांनी वकीला करवी सिद्दीच्या सरदार-सेनेला गाफिल केल होत. आता फक्त त्या चंद्राची,काळोखाची आणि सह्याद्रीची लक्ष्मी असणार्या त्या पावसाच्या सरींची वाट बघत होते.

*लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहीजे*

सुर्यणारायण अस्ताला गेला होता, गडावर सगळीकडे शांत वातावरण होत आवाज होता तो फक्त झाडांच्या पाणाच्या सळसळाटाचा आणि रिपरिप पडणार्या पावसाचा.

तटबंदीवरच्या मशाली पेटल्या होत्या,चौकी पहारे गस्त घालत होते. पुसाटी कडे सहाशे निवडक बांदल जमले होते. तिकडेच ती काय फक्त तणावपूर्ण कुजबूज चालू होती. एव्हाणा सगळ्या पन्हाळ्याला माहिती झाली होती आज राजा वेढा फोडणार आहेत.

शिवा काशीद महाराजांच्या दालनात आले होते. महाराज त्यांना प्रत्येक गोष्ट समजावत होते. शिवा काशीद नी मनाची तयारी केली होती. आता वेळ होती ती शिवा ची शिवाजी होण्याची. ” साहजिकच कोणीही फसेल असा शिवाचा शिवाजी झाला ”

रात्रीचा पहिला प्रहर चालू होता, साधारण नऊ-दहाची दरम्यान होता. महाराज आणि शिवा काशीद पुसाटी कडे निघाले.

पुसाटीवरच्या सगळ्यांचे मुजरे झडले महाराजांसोबत ६००मावळा आणि शिवा सोबत काही अंगरक्षक अशी योजना ठरली होती. शिवाने हमरस्त्याने मलकापूरकडे निघायचे होते तर महाराज आडमार्गे मसाई पठारावरून विशाळगडाकडे कुच करणार होते.

दिंडी दरवाजा करकरला, महाराज, बाजी बांदल,रायाजी बांदल,बाजीप्रभू,फुलाजीप्रभू, शंभुसिंह जाधव आणि बांदल सेनेने पन्हाळ्यास मुजरा केला. आता वेळ होती ती ”रुस्तुम-ए-जमान” ची ”आतुन मैत्री निभावायची”

सगळे दिंडी मार्गे पुसाटी बुरजाच्या खालच्या बाजुस सरकु लागले.

वेढा तसा आता सैल झाला होता कारण सिद्दीच्या तळावर महाराज येणार त्यामुळे सैन्य गाफिल झाले होते. पण वेढा उठवला नव्हता.शिवा काशिदांची पालखी मलकापुरचा मार्ग दौडू लागली.

६०० मावळे दबक्या पावलांनी कधी थोडीशिच धाव घेत,तर कधी सरपटत निघाले होते. त्यांना साथ होती ती आधुनमधुन येणार्या चंद्रप्रकाशाची.वेढा जवळ आला होता, सगळे चिडीचुप पणे सरफटत मसाईचा मार्ग जवळ करत होते. ईथेच जिवाची बाजी पलटवणारा सगळा खेळ होता… ”आई जगदंबेने सार्या स्वराज्याच ऐकल आणि राजा सुखरूप पणे मसाई पठारावर पोहचले” तिकडे शिवा काशिद मलकापुरकडे दौडत होते.

घात झाला सिद्दी जौहरच्या नजरबाजांनी शूरवीर शिवा न्हावी यांची पालखी पकडली. पळून जाणारे छत्रपती शिवाजी महाराज कैद झाला. ती पालखी कडक बंदोबस्तासह सिद्दी जौहरच्या तळावर आणण्यात आली.

शिवाजींना मसुदने जौहर समोर हजर केले, छत्रपती शिवाजी राजे सापडल्याच्या आनंदात सगळीकडे चैन-मस्ती-शराब चालली होती. अफझलखान पुत्र फाजलखान जौहरच्या डेर्यात दाखल झाला.त्याने शिवाजीला पाहताच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली त्याने फेरजबाब केला शिवाजींना आता वेळ आल्याची कल्पना शिवांच्या मनात आली.

जौहर झालेल्या घाताने चरफडत राहीला,लालबुंद नेत्र त्या काळ्य् कूट्ट चेहर्यावर खुप भयावह दिसत होते. जौहर संतापला होता. म्यानातुन समशेर निघाली होती.

”शिवाजी… त्याला जायच तिथ तो जातो, त्याला थांबायच तिथ तो थांबतो, त्याच बसन-उठण, चालन-फिरण हे शत्रुवर अवलंबून नसत.. माझा राजा निघाला… सुखरूप निघाला… शिवाजी राजा म्हणुन मृत्युच भाग्य मला लाभतय माझ्या साता जन्माची पुण्याई, मुजरा घ्यावा राज्ज्ज मुजरा…”समशेर पोटातुन आरपार झालेली.

एव्हाना या सगळ्या गोष्टीत अर्धा प्रहर लोटला होता.महाराज आणि बादंल सेना भर पावसात चिखल तुडवत आड वाटेने विशाळगडाकडे दौड करत होते

ईकडे पन्हाळ्यावरून जौहरने सिद्दी मसूदला महाराजांच्या पाठलागावर पाठवले होते.

स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांना मानाचा मुजरा..


रात्रीचे सगळे प्रहर लोटले होते,

रात्रभर चिखलातून,काट्या-झुडपातून,माळरानातून तर कधी ओढ्यातुन फक्त पळणे झाले होते.कोणाला काही झाल तरी थांबायला उसंत नव्हती कारण राजाला सुखरूप विशाळगडी पोहचवायचे होते.

मावळ्यांच्या पाठीवर सुर्यणारायनाने थाप मारली होती, दिव़ उजाडायला सुरूवात झाली होती. पांढरपाणी यायला थोडाच अवधी होता.हेरांकडून मागची पुढची बातमी कळत होती. सिद्दी मसूद पाठलाग करत जवळच आला होता. आता रणकंदण माजणार होते.

विशाळगड जवळ करता करता ठरल की फौज विभागली जावी आणि अर्धे पुढे निघुन जावे आणि बाकीच्यानी गनिमास थोपवून धरावे. बाजींनी वयाच्या अधिकाराने महाराजांना विनंती वजा आदेश केला ”राज्ज निघा ईथुन, गनिम दावा साधेल निघा. पोहचता क्षणी तोफेच बार काढा, तोपर्यंत मी खिंड थोपवतो.” फौज विभागली गेली.

बाजींनी फौजेला सुचना केली. टप्प्या टप्प्याने लढायला फळी तयार केली होती. काही झाडाझुडपात लपले होते, तर काही कड्यांवर गोफणी घेऊन तयार होते.आता पांढरपाणी ते विशाळगड रणकंदन माजणार होते. सिद्दी मसुदची फौज जवळ आली होती. आता फक्त लढाई करून वेळ काढायचा होता.

पांढरपाण्याला पहिली फळी ऊभी केली होती. सिद्दी मसुदची फौज भिडली. तलवारी वर तलवारी खणखणु लागल्या,प्रचंड कापाकापी चालू झाली, एक मराठा दहा-दहा लोकांना भारायी पडत होता. पण त्या सेनासागरासमोर ती फळी टिकाव धरू शकली नाही. पुढे सरकणार्या मसुदाच्या फौजेला चेव चढत होता. त्या झाडाझुडपात मराठे दिसेना झालेले, तोवर मसुद टप्प्यात आल्याचा ईशारा झाला. त्या सह्याद्रीच्या कुशीतुन हात भिरभिरू लागले, ते गोफणीचे दगड जणु सह्याद्रीच्या तोफेतुन निघणारे तोफगोळे भासत होते. मसुदाच्या फौजेवर आदळत होते, डोकी फुटली जात होती. अनेक गनिम जायबंदी झाला होता. जसजशी मसुदची फौज खिंडीकडे सरकू लागली तस तसे मराठे जमवून ठेवलेल्या दगडी शिळा खिंडीत ढकलून देत होते. मसुदाचा खुप सैन्य मारला गेला होता.

आता वेळ होती ती प्रत्यक्ष लढाईची मसुदचे पायदळ खिंडीत उतरले होते. मराठ्यांच्या तलवारी खाली येईल तो कापला जात होता बाजींच्या तलवारीखाली येईल त्याच शिर सलामत राहतच नव्हते. सिद्दीच्या फळ्यानंतर फळ्या गारद होत होत्या. काही मराठेही पडले होते,काही जायबंदी होऊनही लढत होते कारण ” माझ्या धन्यास सुखरूप विशाळगडी पोहचवायच होत”

आता मसूदने ठासणीचा बंदुकदार आणला होता.त्याला आदेश देण्यात आला होता.मचाणावर चढून त्याने नेम धरला होता. प्रचंड गर्दीत सुध्दा त्याने बाजींना ओळखले होते कारण ”शेंदूर फासल्या हणुमानासारखे बाजी रक्ताळले होते. डोक्यावरची पगडी पडून तुळतुळीत गोट्यावर ती शेंडी रूळत होती आणि तो रणमर्दाचा आवेश” बार निघला तो डसला बाजींच्या खांद्याला.तरीही बाजी लढत होते. काय ते रायाजी बांदल काय त्यांचं शौर्य काय  काय ती स्वामीनिष्ठा…..खर पाहायला गेलं तर इतिहासाला 2 4 नाव माहीत आहे पण त्या रात्री अख्या बांदल सेनेने कहर केला आणि इतिहासात अमर झाले आपल्या रक्ताने ती घोडखिंड पावन केली आणि आम्हा शिवभक्तांसाठी अजून एक पंढरी उभा केली

तोपर्यंत महाराजांनी आणि सोबत गेलेल्या बांदल सेनेने तो विशाळगडाला पडलेला सुर्व्यांचा वेढा फोडला होता. राजे गडावर पोहचले. किल्लेदाराला तोफेचे बार काढण्याची ईशारत झाली. ढडाम-ढुमममम् तोफबार निघाले.ईशारा पोहचला खिंडीत बांजीचे-बांदल सेनेचे कान ज्या गोष्टीसाठी आतुरले होते ती गोष्ट ऐकून बाजी धन्य झाले. जीवन कृतार्थ झाल्याचे मानुन बाजींनी खिंडीत देह ठेवला. घोडखिंड पावन झाली. मराठ्यांची सुध्दा प्रचंड फौज कापली गेली होती. आता हाताच्या बोटावर मोजता येईल ईतकीच फौज शिल्लक होती. राहीलेल्या सगळ्यांनी जंगलात पोबारा केला आणि सिद्दीच्या सैन्यास वाट दिली.

मसूद विशाळगडी पोहचला आता ईथे वेढा घालणे आणि लढाई करणे शक्य नव्हते म्हणुन तो परत पन्हाळगडी फिरला.

असा हा प्रचंड पराक्रम बांदल सेनेच्या रणमर्दांनी गाजवला. आपली स्वामीनिष्ठा मनी धरून आयुष्य कृतार्थ ठरवले. अशा या पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड रणसंग्रामात धारातिर्थी पडलेल्या परिचीत-अपरिचीत वीरांना मानाचा मुजरा.

JULY 14

 *शिवकालीन दिनविशेष**

*१४ जुलै इ.स.१६५९*

छत्रपती शिवरायांनी औरंगजेब बादशहाकडे पाठवलेला वकील "सोनोपंत डंबीर" पुन्हा छत्रपती शिवरायांपुढे हजर.

*१४  जुलै. इ.स. १६७३*

छत्रपती शिवरायांना औरंगजेबाचे पत्र प्राप्त झाले.

*१४ जुलै इ.स.१६७४*

"बहादूरखान कोकलताश" याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. राजाभिषेकानंतर प्रथमच १ कोटींची एवढी प्रचंड लूट मराठ्यांनी रायगडावर जमा केली.

JULY 15

 *शिवकालीन दिनविशेष*

"बहादूरखान कोकलताश" याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली.

राजाभिषेकानंतर प्रथमच १ कोटींची एवढी प्रचंड लूट मराठ्यांनी रायगडावर जमा केली. *पेडगावची लूट* छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी मुघल सुभेदार बहादूरखानचा केलेला "एप्रिल फुल"

छत्रपती शिवाजी महाराजांचा अलौकिक राज्याभिषेक सोहळा रायगडवर संपन्न झाल्यावर आर्थिक रसद मिळण्यासाठी महाराजांचं लक्ष मोगली अधिपत्यात असलेल्या पेडगांवकडे गेलं. योजना तयार झाली. 


स्वराज्याच्या सैन्याच्या लहान तुकडीनं बहादूरखानाच्या बहादूरगडवर हल्ला चढवला. मोगली सेनापती बहादूरखानानं जोराचा प्रतिकार केला, तेव्हा स्वराज्याचं सैन्य माघार घेऊ लागलं, हे पाहून मोगली सैन्यानं पाठलाग सुरू केला. हा पाठलाग फार दूरपर्यत गेल्यावर मराठी सैन्याच्या दबा धरून बसलेल्या मोठ्या तुकडीनं या गडावर हल्ला केला. बहादूरखानाचं सैन्य मराठ्यांच्या लहान तुकडीचा पाठलाग करत गेल्यामुळे फारसा प्रतिकार झाला नाही. 


परिणामी भरघोस लूट करण्यात मराठ्यांना यश आलं. या लुटीत दोनशे जातीवंत घोडे मिळाले जे औरंगजेबाला भेट देण्यासाठी बहादूरखानानं आणले होते. सुमारे एक कोटी रुपयांची संपत्ती स्वराज्यासाठी मिळाली. दमलेला बहादूरखान मराठ्यांचा पाठलाग करायचा सोडून पेडगावला आला. गडाची लूट पाहून तो धास्तावला.


गनिमी काव्याचा धडा खान ए जहान बहादूरखानाला शिकायला मिळाला होता. 

तेव्हा पासून अतिशहाणपणा करणाऱ्याला "पेडगावचा शहाणा" असं म्हणण्यात येऊ लागले.

JULY 16

 *#*शिवकालीन दिनविशेष*

*१६ जुलै १९८६*

*शिवरायांचे सत्य चित्र शोधणारे इतिहासाचे भिष्माचार्य कै. वासुदेव सीताराम बेंद्रे*

वासुदेव सीताराम बेंद्रे (जन्म: पेण,रायगड जिल्हा-महाराष्ट्र, १३ फेब्रुवारी १८९६; मृत्यू १६ जुलै १९८६) हे महाराष्ट्रातील एक इतिहासकार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज सर्वमान्य असलेली जन्मतिथी-फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१, (१९ फेब्रुवारी, सन १६३०)- ही नक्की करण्याचे अभूतपूर्व काम वा.सी. बेंद्रे यांनी केले. त्यापूर्वीच्या असंख्य इतिहासकारांनी दिलेली तिथी-इ.स. १६२७, शके १५४९ प्रभव नाम संवत्सर, वैशाख शुक्ल तृतीया- ही आता महाराष्ट्रात तरी ग्राह्य धरली जात नाही.

 जेव्हां लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची श्री.बेंद्रे ह्यांना संधी मिळाली तेव्हां अशी साधने तपासतांना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एकअतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला. तो पर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र “ छत्रपती शिवाजी महाराजांचे” चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहास विषयक पुस्तकातून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते. या वरून त्याच आकृतीचे चेहरे रंगवून मुसलमान पेहराव चढवलेली तथाकथित शिवाजी महाराजांची बरीच चित्रे प्रसारात आली होती. संदर्भ हीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते. इ.स.१९१९ मध्ये श्री बेंद्रे छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनाची तयारी करीत होते. ग्रंथ चाळताना त्यांच्या समोर मैंकेनझीने संपादित केलेल्या ग्रंथाचे काही भाग होते, त्यात व्हैलेनट्यीन ह्या दुच गव्हरनरने लिहिलेले एक पत्र त्यांच्या हाती पडले.

इ.स. १६६३-६४ सुरतेच्या डच बखरीत तो गव्हर्नर होता. त्याच्या आणि महाराजांच्या भेटी प्रसंगी काढून घेतलेले चित्र आणि व्हैलेनटाइनचे पत्र श्री बेंद्रे ह्यांना ह्या पत्रात मिळाले. श्री. बेंद्रे यांनी मूळ चित्राचे तितक्याच आकाराचे एक छायाचित्र काढून घेतले शिवाजीराजांचे ह्या चित्रातील कल्ले हे कोणत्याही चित्रात दिसणारे नाहीत. पांढर्या अंगरख्यावर शिवरायांनी चक्क उपरणे टाकले आहे. अंगावरील दागिने हे अस्सल मराठी पद्धतीचे आहेत. इंग्लंड मध्ये या चित्राची त्यांनी खात्री करून घेतली.ह्या चित्राच्या प्राप्तीमुळे श्री बेंद्रे ह्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वाची देणगीच मिळाली! शिवाजी महाराजांच्या या चित्रामुळे “इब्राहिमखान” पुस्तकातून हटला गेला. बेंद्रे यांनी प्राप्त केलेल्या शिवरायांची स्थापना इतिहासविषयक पुस्तकातून आणि घराघरातून झाली. शिक्षण संस्थांनाच काय पण शासकीय यंत्रणेलाही त्यांच्या कार्यालयातील शिवाजी महाराजांच्या चित्र मागील अज्ञात गोष्टी आणि डच गव्हर्नरचे लेखन याची माहिती नसेल. ह्या चित्राची प्राप्ती ही बेंद्रे ह्यांची एक अतिशय महत्वाची कामगिरी मानावी लागेल.

पुढे श्री बेंद्रे ह्यांनी ह्या चित्राच्या प्रसारास प्रारंभ केला. चित्राच्या आकाराच्या प्रती काढण्यासाठी त्यांनी इंडिया हाउस कडून परवानगी मिळवली.सरकारी छापखान्यातून अशा प्रती छापण्याची त्यांनी योजना केली. इ.स. १९३३ मधील शिवजयंतीच्या निमित्ताने साहित्याचार्य न. ची. केळकर ह्यांनी हे चित्र समाजापुढे आणण्यासाठी पुण्यातील शिवाजी मंदिरात कार्यक्रम योजला. तेथे या चित्राचे समारंभपूर्वक प्रकाशन केले.पुण्याच्या शिवाजी मंदिरात प्रेक्षक आले ते त्यांच्या राजाचे खरे रूप पाहण्यासाठी. शिवाजी महाराजांचे सत्य चित्र श्री.तात्यासाहेब केळकरांनी त्या दिवशी प्रकाशित केले. शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून आज सर्वत्र ज्या छायाचित्राला मान्यता मिळाली आहे ते छायाचित्र इतिहासकार वासुदेवराव बेंद्रे यांनीच एकेकाळी आपल्या परदेश दौर्‍यात हस्तगत केले होते व स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केले होते श्री. बेंद्रे यांनी सर्व मराठीतील वृत्तपत्रांकडे शिवरायांचे हे चित्र पाठवले आणि सर्व भाषांतील वृत्तपत्रांनी व्हॅलेंटाईनच्या पत्रासह ते छापले.रायगडचा राजा तेव्हांपासून खर्या रुपात घरोघरी गेला.

  २. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या चित्र शोधानंतर उल्लेखनीय अशी त्यांची भरीव कामगिरी म्हणजे संभाजी महाराजांचे चरित्र होय. वा. सी. बेंद्रे यांच्या ४० वर्षांच्या अथक संशोधनाने, तोपर्यंत जनमानसात असलेली संभाजी महाराजांची नकारात्मक प्रतिमा खोडली गेली, आणि एक लढवय्या मराठी राजा अशी त्यांची प्रतिमा पुढे आली. आपल्या संशोधनाच्या साहाय्याने त्यांनी वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांची समाधी शोधून काढली. आपल्या कामावरील निष्ठा आणि प्रेम हे वा.सीं.चे गुण ते महाराष्ट्राचे सच्चे भूमिपुत्र असल्याची साक्ष देतात. त्यानंतरच्या काळात अनेक लेखक, कलाकार यांनी वा. सी. बेंद्रे यांच्या साहित्याचा आणि लिखाणाचाच आधार घेऊनच संभाजी महाराजांची प्रतिमा साकारली.

३. वा.सी. बेंद्रे यांचे संशोधन फक्त मराठा राज्याचे व राजांचे जीवनकार्य मांडण्यापुरते मर्यादित नव्हते, तर ज्यांनी मराठेशाही रुजण्यासाठी अपार मेहनत घेतली अशा तत्कालीन काळातील सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वांचाही परामर्ष त्यांनी घेतला आहे. त्यांनी शोधून काढलेले अप्रकाशित संतांचे अभंग याचीच साक्ष देतात. हे अभंग त्यांच्या मृत्यूनंतर १९८६ साली प्रसिद्ध झाले.

४. सत्तर वर्षांपेक्षाही जास्त कालखंडात त्यांनी इतिहास संशोधनावर आधारित ६०च्यावर पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेली पुस्तके ही, इतिहास संशोधन हे कसे शास्त्रीय कसोटीवर आणि वस्तुस्थितीला धरून असणारे असले पाहिजे याची उत्तम उदाहरणे आहेत. लिखाण करत असताना कोणतेही नाट्य तसेच कपोकल्पित वाटणार नाही याबाबत ते सावध असत. त्यामुळे बेंद्रे यांची काही पुस्तके जगभरातील नावाजलेल्या वाचनालयात तसेच अमेरिकेच्या व्हाईट हाउसच्या वाचनालयात पाहायला मिळतात.

५. त्यांनी लिहिलेले ‘साधन-चिकित्सा ‘ हे पुस्तक इतिहास संशोधन करणाऱ्यांना आजही पथदर्शक ठरते आहे. हे संशोधन करताना ते अत्यंत दक्षतेने आणि काटेकोरपणे कसे केले पाहिजे याचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी लिहिलेले हे पुस्तक अशा प्रकारचे एकमेव पुस्तक असून त्या प्रकारचे पुस्तक एकही मराठी इतिहासकाराने लिहिल्याचे दिसत नाही.

६. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे चरित्र लिहून वा.सी. बेंद्रे थांबले नाहीत तर, त्याच बरोबर बरेच संशोधन करून त्यांनी इतरही पुस्तके लिहिली. उदा० शहाजीराजे भोसले (शिवाजी महाराजांचे वडील), मालोजीराजे भोसले (शिवाजी महाराजांचे आजोबा), संभाजी भोसले (शिवाजी महाराजांचे वडील बंधू ), राजाराम, आदिलशहा, कुतुबशहा आणि राजा जयसिंग. बेंद्रे यांनी या व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास करून मराठेशाही रुजवण्यास कोणत्या घटना व प्रसंग कारणीभूत ठरले हे शोधून काढले. फार थोड्या व्यक्तींनी या पर्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

७. त्यांच्या संशोधनात्मक लिखाणाचे अस्सल उदाहरण म्हणजे त्यांनी लिहिलेले ‘शिव-चरित्र’ (शिवाजीचे चरित्र). हे लिहिण्यापूर्वी बेंद्रे यांनी दोन वर्षे इंग्लंडमध्ये व युरोपात वास्तव्य करून ब्रिटिश म्युझियम तसेच युरोपातील विविध म्युझियममधील कागदपत्रांचा अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धकाळात त्यांनी या ठिकाणाहून गोळा केलेली अनेक महत्वाची कागदपत्रे जहाजाने भारतात आणली. यामुळे जो कालखंड दुर्लक्षित राहिला होता त्यावर प्रकाश पडला. त्यांच्या या प्रवासामुळे अनेक सत्ये समोर येऊ शकली, त्यापैकी एक म्हणजे शिवाजी महाराजांची तलवार. ही तलवार ‘जगदंब’ म्हणून ओळखली जात होती, ‘भवानी तलवार ‘ म्हणून नव्हे हे बेंद्रे यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

८. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे आणि अभिमानाचे असे जनमानसावर अधिराज्य असणारे व्यक्तिमत्त्व. त्याचमुळे महाराष्ट्रसरकारने अनेक विद्वानांना शिवाजीचे चरित्र लिहिण्याचे आवाहन केले. त्यासाठी अनेक सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दिले आणि भरपूर मानधनाचीही तयारी दाखवली, परंतु लिखाणाचे हे शिव धनुष्य पेलण्यासाठी कोणीही पुढे येईना. फक्त वा. सी. बेंद्रे यांनी अत्यंत यशस्वीरीत्या हे आव्हानात्मक काम स्वीकारले. हे लिखाण म्हणजे त्यांच्या समर्पण वृत्तीचे आणि वर्षानुवर्षे केलेल्या साधनेचे फळच आहे.

९. वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत किचकट असे चार कोटींहून अधिक पानांच्या पेशवा दप्तराच्या दस्तऐवजाचे वर्गीकरण व जुळणी करण्याचे, तसेच कॅटलॉगिंगचे काम चिकाटीने अल्पावधीत पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्यावर तंजावर दप्तराचे कॅटलॉगिंग करण्याची जबाबदारी, मद्रास राज्याचे तत्कालीन मुखमंत्री राजगोपालाचारी यांनी दिली. जे काम पूर्ण होण्यास पाच वर्ष कालावधीची अपेक्षा सरकारने केली होती, ते काम वा.सी. बेंद्रे यांनी अत्यंत चिकाटीने अवघ्या दोन वर्षात पूर्ण केले. त्यांचे हे कार्य केवळ त्यांच्या अफाट कार्यक्षमतेची, जिद्दीची आणि परिश्रमाची परिणती आहे.

१०. त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी ‘राजाराम महाराज चरित्र’हा ग्रंथ लिहिला


JULY 17

*#शिवकालीन दिनविशेष*

*१७ जुलै इ.स.१६५३*

*छत्रपती शिवरायांनी "सिद्धेश्वर ब्रम्हे" यांना वर्षासन दिले.

*१७ जुलै इ.स.१६७३*

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अस्सल कौलनामा अथवा अभयपत्र ! पुणे प्रांतातील मौजे चिंचवडच्या मोकदमाने 'गावावर मोगलांची सततची आमदनी (ये-जा.. थोडक्यात हल्ला) होते तसवीस (तोशिस) लागते यामुळे गावात राहवत नाहीजर साहेबांचा (छत्रपती शिवाजी महाराजांचा) हुकूम असेल तर मोंगलांशी (दिखाव्यापुरता) तह करून कौल घेऊन गाव सुरक्षित ठेवावे अशी इच्छा महाराजांकडे बोलून दाखवल्याने महाराजांनी त्याला मोंगलांशी साजिश करताना भल्या माणसाला मध्यस्ती ठेऊन त्याच्या हाते मोंगलांकडून कौल घ्यावा आणि रयतेस काडीचाहीआजार लागत नाही असे पाहूनच सुखे गावावरी रहावे. जर मोंगलांचा कौल पुरता विश्वासाचा नसेल तर गावावरी राहण्यास परवानगी नाही' असा कौल दिला... हे पत्र दि. १७ जुलै १६७३ रोजीचे, औरंगजेबाशी असलेला पुरंदरचा तह मोडल्यानंतरचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी असलेला तह मोडला आणि तहातले किल्लेपरत जिंकून घेतले यामूळे मोंगल भडकून पुन्हा स्वराज्याच्या उत्तर सरहद्दीवर हल्ले चढवत होते. या कौलनाम्याच्या माथ्यावर महाराजांची 'प्रतिपच्चंद्रलेखेव' ही

राजमुद्रा आहे, त्याखाली मायन्यात डाव्या बाजूला महादजी

शामराज यांची मुद्रा असून अखेरीस 'मर्यादेयं विराजते' ही मर्यादा मोर्तब आहे.

*१७ जुलै इ.स.१६७७*

*६ जुलै रोजी झालेल्या "छत्रपती शिवराय" आणि मदुरै चा

नायक "चौकनाथ" यांच्यात झालेल्या तहानुसार चौकनाथ तब्बल

एक लाख रूपयांची खंडणी घेऊन आपल्या वकीलामार्फत

शिवरायांपुढे हजर.*

JULY 18

*#शिवकालीन दिनविशेष*#*

*१८ जुलै इ.स.१६८१* रोजी पहाटे छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीचा कायमचा काटा काढण्यासाठी उंदेरीवर निर्णायक हल्ला केला. या युध्दात सिद्दीचे प्रचंड नुकसान झाले. पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही.

*#खांदेरी-उंदेरी*

खांदेरी हा किल्ला दोन टेकड्यांनी तयार झालेल्या बेटावर वसवला आहे. उत्तर - दक्षिण पसरलेल्या या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी इ स १६७९ मध्ये शस्त्रास्त्रे, दारुगोळा, सुमारे तीन एकशे सैनिक आणि तितकेच कामगार पाठवून या किल्ल्याचे बांधकाम सुरु केले. हि बातमी इंग्रजांच्या कानी पडताच त्यांनी हा भूभाग त्यांचा असल्याचा दावा केला. त्यामुळे इंग्रजांनी १९ सप्टेंबर १६७९ रोजी चाळीस एक बंदूक धारी सैनिकांनीशी व्यापारी जहाज घेवून खांदेरी वर हल्ला चढविला, त्या काळी इंग्रजांकडे मराठी आरमारात असणारी, उथळ समुद्रात वेगाने अंतर कापणारी गलबते नसल्याने त्यांना व्यापारी जहाजे वापरावी लागली. त्यांची व्यापारी जहाज (शिबार) खडकाळ किना-यामुळे खांदेरी वर पोहोचू शकले नाही. त्यांना खराब हवामानामुळे परतावे लागले. किनाऱ्यावर परतताना मराठी मावळ्यांनी त्यांचे व्यापारी जहाज सैन्यासह समुद्रात बुडविले. मराठ्यांची गलबते छोटेखानी आणि निमुळती असल्याने त्यांना खांदेरी वर सैन्य सहजी पोहोचवता येत असे, अगदी या उलट इंग्रजाचे जहाज आकाराने मोठे असल्याने खांदेरी त्यांच्या आवाक्यात येत नव्हता. खांदेरी वारीला इंग्रजांचा हल्ला फसल्याची जखम भरते न भरते तोवर इंग्रजांना आणखी एक बातमी मिळाली. ती अशी कि छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमून दिलेला चौलचा सरखेल दौलतखान आपली कुमक घेवून खांदेरी ला रवाना झाला आहे. हि बातमी काळातच इंग्रजाचे पित्त खवळले आणि आठ जहाजे घेवून सुमारे दोनशे सैन्यानिशी त्यांनी पुन्हा खांदेरी वर हल्लाबोल केला. नौदल सेनापती किवीन याकडे या मोहिमेचे नेतृत्व देण्यात आले. तीन-चार मध्यम आकाराच्या होड्या (खडकांची खोली मोजण्यासाठी सोबत लांबलचक बांबू), दोन व्यापारी जहाजे (शिबार), दोन-तीन मचवा (कोळी लोकांच्या लहान होड्या) इत्यादी फौजफाटा दिमतीला घेवून सेनापती किवीन निघाला. तिकडे अलिबाग वरून खांदेरी कडे गलबतांचा ताफा निघाला, इकडे इंग्रज तयारच होते. त्यांनी पाच गलबते समुद्रात बुडविली आणि मागे फिरलेल्या उरलेल्या गलबतांचा नागोठण खाडी पर्यंत पाठलाग केला. इतका पराक्रम गाजवून देखील इंग्रजांना दर्यावर्दी मावळ्यांना खांदेरी वर जाण्यास रोखता आले नाही. लहान बोटीतून मावळ्यांचे जत्थे च्या जत्थे खांदेरीवर येवून थडकले. या दरम्यानच्या काळात मराठ्यांनी खांदेरी वर मोठ्या संख्येने तोफा उभारल्या. खांदेरी ला एखाद्या छावणी चे स्वरूप प्राप्त झाले होते, शेवटी हा हिंदवी स्वराज्याच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होता. 

दौलतखान च्या सोबतीचे मराठे सैन्य जुमानत नाही हे पाहून शेवटी इंग्रजांनी मोघलांचा सरनौबत जंजिर्याच्या सिद्दीची कुमक जोडून घेण्याचे ठरवले. आता एका बाजूला जंजिर्याचा सिद्दी आणि दुसरीकडे इंग्रज अशा दोन कसलेल्या गनिमांशी मराठी सैन्य दोन हात करू लागले. इकडे खान्देरीचा पाडाव होत नाही के पाहून संतापलेल्या सिद्दीने उंदेरी वर किल्ल्याचे बांधकाम सुरु ठेवले. एके बाजूने उंदेरीवर किल्ला बांधायचा आणि दुसरीकडे खांदेरी वरील बांधकामाला अडसर करायचा असा दोन कलमी कार्यक्रम सिद्दी राबवत होता. दरम्यान जर खांदेरी घेतला तर तो स्वतः कडे ठेवून घेण्याचा सिद्दीचा डाव इंग्रज अधिकारी किवीन च्या ध्यानी आला आणि इंग्रजांनी सिद्दी हा छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा शिरजोर ठरू शकेल या भीतीपोटी खांदेरी मोहिमेचा जोर कमी केला. इंग्रजांनी माघार घेतली तरी सिद्दी ने उंदेरी चे बांधकाम पूर्ण केले आणि खांदेरी वर तोफांचा मारा सुरूच ठेवला. सुमारे चार-पाच महिने चालले हे चालूच राहिले. शेवटी २७ जानेवारी १६८० दौलत खाना यांचा पाडाव झाला आणि सिद्दी ने खांदेरी वर कब्जा मिळविला. सिद्दी ने खांदेरी वर ताबा मिळताच मराठी व्यापारी आणि मच्छिमारांना सातावण्यास सुरुवात केली. छत्रपती संभाजी राजांच्या आदेशानुसार सुमारे दोन-अडीचशे मावळ्यांनी उंदेरीवर शिड्या लावल्या.. पण सिद्दी च्या सैनिकांनी हा हल्ला परतवून लावला

JULY 19

 *#शिवकालीन दिनविशेष*#**

*खोट्यातून खऱ्या इतिहासाकडे*

वा. सी. बेंद्रे यांचे संभाजीचरित्र हा छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रसंशोधन क्षेत्रातील एक

युगप्रवर्तक टप्पा आहे. महाराष्ट्रामध्ये शे-दीडशे वर्षे रूढ असलेली छत्रपती संभाजी महाराजांची 'दुराचारी व दुर्वर्तनी' प्रतिमा बेंद्रे यांनी आपल्या ग्रंथाने नष्ट करून मराठी माणसास एका 'पराक्रमी, शूर, मुत्सद्दी, दूरदर्शी व कर्तव्यदक्ष' अशा राजाचे दर्शन घडविले. त्यामागे वा. सी. बेंद्रे यांचे ४०/४२ वर्षांचे अथक परिश्रम म्हणजे महाराष्ट्र संशोधन क्षेत्रातील एका साधनेची गाथाच आहे. एखाद्या योग्यास शोभावी अशी ही ध्येयसाध्यासाठी केलेली एका संशोधकाची ती तपश्चर्या होती या तपश्चर्येचे फल पाहून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसारखे महापंडितही स्तिमित झाले! आणि त्यांनी उद्गार काढले : “या संभाजीच्या चरित्राने एक प्रभावी व मंगल सत्य प्रकट केले आहे... इतिहास साधनांच्या प्रचंड पर्वताच्या उत्खननाच्या उलाढालीत जुना लोकप्रसिद्ध धर्मवीर परंतु दुर्गुणी संभाजी न सापडता एक महान विभूती असलेले छत्रपती संभाजी संभाजी (बेंद्र्यांना) गवसले आहेत.. आता मराठ्यांच्या इतिहासातील एकाअभिमानास्पद कालखंडाच्या पार्श्वभूमीत एक उज्वल, दिव्य व भव्य अशी छत्रपती संभाजी महाराजांसारखी व्यक्ती उभी आहे..." बेंद्रे यांच्या  संभाजीचरित्राचा प्रभाव त्यानंतरच्या मराठी साहित्यिकांवर पडल्याशिवाय

राहिला नाही. विशेषत: प्रा. वसंत कानेटकर आणि शिवाजी सावंत या दोन प्रतिभासंपन्न साहित्यिकांच्या कलाकृती ह्या त्याची ठळक उदाहरणे आहेत. छत्रपती संभाजीराजाची

'न्याय्य' बाजू समाजासमोर मांडण्याचे कार्य आपल्या साहित्यातून या लेखकांनी

केले आहे.

तेव्हा आपण पुस्तके वाचताना कोणत्या लेखकाची वाचत आहोत हे नीट पाहावे नाहीतर चुकीचा इतिहास हा घातक आहे

JULY 20

 *शिवकालीन दिनविशेष*

*वा. सी. बेंद्रे यांच्या नंतर चे लेखक*

डॉ. कमल गोखल्यांचा 'शिवपुत्र संभाजी' बेंद्रे यांच्या नंतर डॉ. कमल गोखल्यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या ग्रंथाची आपण दखल घेतली पाहिजे. डॉ. गोखल्यांनी बेंद्र्यांच्या प्रमाणेच 'संभाजी'ची नवी प्रतिमा आपल्या चरित्रातून दिली आहे; पण बेंद्र्यांचा ‘संभाजी' हा ‘सर्वगुणसंपन्न' असून तो कधीही चुकतच' नाही; गोखल्यांनी 'संभाजी'कडून चुका होण्याची शक्यता गृहीत धरली आहे! तसेच आपल्या ग्रंथात त्यांनी बेंत्र्यांच्या माहितीत भर टाकून तर काही ठिकाणी दोष दाखवून स्वतंत्र विवरणही केले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बेंत्र्यांच्या क्लिष्ट संशोधकीय शैलीने व कागदपत्रांच्या भडीमाराने बेजार झालेल्या मराठी माणसास एक सुबोध संभाजीचरित्र डॉ. गोखल्यांनी दिले आहे.

*डॉ. शिवदे यांचा 'ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा'*

अलीकडेच २००१ साली डॉ. सदाशिव शिवदे यांनी 'ज्वलज्ज्वलनतेजस

संभाजीराजा' या नावाचे संभाजीचरित्र प्रकाशित केले आहे. उपलब्ध साधनांची

सविस्तर चर्चा करीत डॉ. शिवदे यांनी संभाजीराजांचे एक चिकित्सात्मक पण सुबोध

व रसाळ चरित्र सादर केले आहे. त्यामध्ये त्यांनी संभाजी राजांच्या, 'शौर्य, धैर्य, साहसादी' गुणांचे यथोचित दर्शन घडविले असले तरी त्यांच्या दोषाचीही परखडपणे

चर्चा केली आहे. कवि कलशाची 'कुसंगत' राजाच्या अध:पतनास कारणीभूत झाल्याचा डॉ. शिवदे यांचा स्पष्ट अभिप्राय आहे. संभाजीराजांच्या युद्धमोहिमांचे

वृत्तांत, तत्संबंधी अभ्यासपूर्ण नकाशे व अनेक ऐतिहासिक पत्रांची व व्यक्तींची दुर्मिळ छायाचित्रे यामुळे हा ग्रंथ संभाजी-चरित्र साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे.

JULY 21

JULY 22

 **शिवकालीन दिनविशेष**

*२२ जुलै १६७८*

किल्ले वेल्लोर स्वराज्यात दाखल केला. २५ मे १६७७ रोजी छत्रपती शिवरायांनी वेल्लोर किल्ला वेढला. किल्ला अब्दुलखान हबशीच्या ताब्यात होता. त्याला देखील राजांनी तह करून किल्ला देण्याची मागणी केली. परंतू त्या हबशाने ती धुडकावून लावली. तो कोट होता देखील तसाच कडक, बेलाख.

सभासदाने किल्ल्याचे केलेले वर्णन - येळूरकोट यामध्ये इदलशाई ठाणें होते. तो कोट म्हणजे पृथ्वीवर दुसरा गड असा नाही. कोटांत जीत पाणियाचा खंदक. पाणीयास अंत नाही असें. उदकांत दाहा हजार सुसरी. कोटाचे फांजीयावरून दोन गाडिया जोडून जावें ऐशी मजबुती.

 पडकोट तरि चार चार फेरीयावरी फेरे. ये जातीचे कोट.

जिंजीचा ताबा कुत्बशाहास न दिल्याने तो नाराज झाला व राजांच्या मदतीला दिलेले सैन्य माघारी गेले वेळप्रसंगी अपेक्षित अशी तोफखान्याची मदत न मिळाल्याने किल्ल्याला वेढा देऊन आतील किल्लेदारास जेरीस आणण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता, आणि म्हणूनच राजेंनी नरहर रुद्र या अधिकाऱ्यास २ हजार घोडदळ व ५ हजार पायदळ देऊन हा वेढा दिला. व राजे शेरखान लोदिच्या समाचारास पुढे निघून गेले.

वास्तविक वेढे देणे हे काम मराठ्यांना कधी माहितच नव्हते. कारण वाघाचा फक्त एकच खाक्या झटपट झटापट मार झडप की कर गडप ४ महिने, ६ महिने वर्षे दीड वर्षे खेळत बसणे ही मराठ्यांची युद्धनीती देखील नव्हती पण स्वराज्यापासून लांब त्यात तोफखान्याची मदत न मिळाल्याने वेढा देणे भाग पडले.

मराठ्यांचा विळखा अगदी अजगराप्रमाणे पडला १४ महिने कसबसा किल्ला लढवून अब्दुलखान पुरा वैतागला होता. मराठ्यांच्या चिवटपणाची चव त्याने चाखली. अखेरीस किल्ल्यात साथीचा रोग पसरला. विजापूरहून देखील. मदत मिळेना. त्यामुळे रघुनाथपंतांकडून ५० हजार होन घेऊन अब्दुल्लाखानाने वेल्लोरचा किल्ला त्यांना देऊन टाकला. शके १६००, कालयुक्त संवत्सरात श्रावण शुद्ध चतुर्दशीला म्हणजेच दि २२जुलै१६७८ वेल्लोरचा बलदंड गड स्वराज्यात दाखल झाला. यावेळी राजे रायगडी होते. 

*२२ जुलै इ.स.१६८९*

पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचालींना पायाबंद घालण्यासाठी मराठ्यांनी शंभूराजांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोकणात रेवाड्यांवर चढाई केली  आणि चौलच्या किल्ल्याला वेढा घातला. किल्ल्यावरील कॅप्टन दोम फ्रान्सीस्को द कास्त याने मराठ्यांनी लावलेल्या शिड्या खाली ढकलून दिल्या. वसईच्या जनरलने मराठ्यांविरुद्ध सिद्दी याकुताखानाकडून ४०० सैनिकांची कुमक मिळवली. त्यापैकी किमान ५० जण बुडून मेले. युद्धाला तोंड फुटले. पोर्तुगीजांच्या अचूक नेमबाजीमुळे मराठे ठार होऊ लागले हे पाहताच शंभूराजांनी माघार घेऊन जवळच्या टेकडीवरील कोरलईच्या किल्ल्यावर हल्ला केला. किल्ल्याच्या कॅप्टनने गुप्तपणे किल्ला चढणाऱ्या मराठ्यांना पाहून तोफा डागल्या. शंभूराजांच्या आज्ञेवरून निळो मोरेश्वर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी उत्तरेतील मुलखाची जाळपोळ केली.

JULY 23

JULY 24

JULY 25

JULY 26

JULY 27

*शिवकालीन दिनविशेष*

*२७ जुलै इ.स.१६७३*

भर पावसाळ्याच्या सुमारास "छत्रपती शिवरायांनी"  "सातारा प्रांत" जिंकला.

*२७ जुलै इ.स.१६६६*

"छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना  "महासींह शेखावत" याने सोबतच्या इतर राजपुत सरदारांना  महाराजांच्या पराक्रमाविषयी  माहीती सांगुन कौतुक केले

JULY 28

 *शिवकालीन दिनविशेष

*२८ जुलै इ.स.१६६९*

छत्रपती शिवरायांनी वाईच्या देशमुखास कौलनामा दिला.

*२८ जुलै इ.स.१६८५*

छत्रपती संभाजी महाराजांचा खासगी नोकर "परशा" मुघलांना फीतूर झाला.

*२८ जुलै इ.स.१६८२*

फ्रान्सिको ताव्होरा, आल्वोरचा काउंट हा सन १६८१ पासून १६८६ पर्यंत गोव्याचा मुख्य गव्हर्नर असून संभाजी कदाचित गोवा हस्तगत करून आपला उठाव करेल या भीतीने शक्य तितक्या उपायांनी गोव्याचा बचाव करण्याच्या तयारीत होता. 

आजच्याच दिवशी संभाजी राजांना पत्र पाठवून नुकत्याच झालेल्या पुत्रा ( शाहू ) चे अभिनंदन केले. 

*२८ जुलै इ.स.१६८२*

मराठ्यांच्या वकीलामार्फत छ. शंभूराजेंना पुत्र झाल्याचे जेव्हा विजरईला समजले तेव्हा, त्याने छ. शंभुराजेंना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केले व नवीन जन्मलेल्या पुत्रास ( शाहूस ) एक दागिना नजर केला. छत्रपती संभाजी राजांनी येसाजी गंभीरराव बरोबर विजरईला दुसरे पत्र लिहून कळवले कि, डिचोली व कुडाळ यांच्या परिसरात आपण २ दारूचे ( तोफांची दारू ) कारखाने उभारले असून कर्नाटकात व मलबारमध्ये तोफा, गंधक हे सामान विकत घेण्याची परवानगी मिळाली आहे तरी त्यास पोर्तुगीज आरमाराकडून अडथळा निर्माण होऊ नये. यानंतर, आजच्या दिवशी विजरईने पत्र लिहून महाराजांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.

JULY 29

JULY 30

JULY 31

AUGUST 1

१ ऑगस्ट १७६०


 मराठा सेना, पेशवे सदाशिवराव भाऊसाहेब यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत येऊन पोहोचली.

AUGUST 2

  शिवकालीन दिनविशेष

 २ ऑगस्ट  १६४८ छत्रपती शिवरायांनी “शिरवळ” ठाणे ताब्यात घेतले.

   १६७७ दक्षिण मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी “वेलवान्सोरचा किल्ला” ताब्यात घेतला.

१६८० मे महिन्याच्या दरम्यान संभाजीराजेनी रामजी नाईक ठाकूर या आपल्या वकिलांबरोबर गोव्याचा विजरई अंतोनियो पाईस द सांदे याला सलोख्याचे पत्र पाठवून आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी दिली आणि आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले होते आणि मराठे आणि पोर्तुगीज यांच्यात तह करण्यास सुचवले होते. विजरईनेही संभाजीराजेना पत्र पाठवून महाराजांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले होते व तहाच्या सूचनेला मान्यता दिली होती, शिवाय कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडित याला भेटीच्या वेळी आपण साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली थांबवण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर रायाजी पंडितकडे संभाजीराजेंना भेट म्हणून एक सोन्याचा मुलामा दिलेली बंदूक व चार कापडाचे नगही दिले होते. दोन्ही बाजूंनी अशी शांततेची बोलणी सुरू असताना मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी हा पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणाने वागत होता. त्याने पोर्तुगीजांच्या बारदेश मधील सिओलीम हे गावात छापा टाकून तेथील तीन माणसांना पकडले होते. डिचोलीच्या मराठी सुभेदारानी सिओलिम गावात छापा टाकण्याची तारीख होती २ ऑगस्ट १६८०

 १७६० २ ऑगस्ट सन १७६० रोजी सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले.


AUGUST 3


  




शिवकालीन दिनविशेष

 ३ ऑगस्ट १६७७ छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेत वृद्धाचलम् येथे मुक्कामी आले. इथून महाराजांनी परतीचा प्रवास सुरु केला.

AUGUST 4

 शिवकालीन दिनविशेष

 ४ ऑगस्ट १६६८ शिवरायांनी कोकणातील जैतापूर जिंकले.   १७३० भाऊसाहेब अर्थात सदाशिवरावांचा जन्म. भाद्रपद शुद्ध द्वितीया शालिवाहन शक १६५२, साधारणनाम संवत्सर, दि. ४ ऑगस्ट १७३० रोजी चिमाजीअप्पांना पहिलाच पुत्र झाला.



AUGUST 5

  शिवकालीन दिनविशेष 

 ५ ऑगस्ट १६५२ १२ मावळची सुरूवात जिथून होते त्या रोहीड खोऱ्यातील “खोपडे देशमुख” हे पहिल्यापासून स्वराज्यासाठी ईमाने इतबारे सेवा देणारे घराणे. पण त्याच “खोपडे देशमुख” घराण्यात नेहमीच भाऊबंदकीचा वाद व्हायचा पण शिवरायांच्या मध्यस्तीने व सामंजस्याने हा वाद पूर्णपणे मिटवला गेला.  

 १६७७ छत्रपती शिवरायांनी आदिलशाही ताब्यातील एलवनसुर हे ठाणे व किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल करून घेतला. एलवनसुर हा भाग व्यंकोजी राजे यांच्या जहागिरीतील एक महत्त्वाचे ठाणे होते.

१६८९ नागपंचमी दिवशी जिंजीच्या दरबारात संताजीराव घोरपडे यांना सरसेनापती पद मिळाले.



AUGUST 6

 शिवकालीन दिनविशेष 

 ६ ऑगस्ट १६४८ छत्रपती शिवरायांनी “किल्ले पुरंदर” वर हल्ला केला किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल.  

१६५७ छत्रपती शिवाजी महाराजांनी अहमदनगर च्या मुघल छावणीवर हल्ला चढविला.

 १६५९ ठाण्याच्या पोर्तुगिझ गवर्नरने गोवा येथील प्रमुख गवर्नरला ‘मराठ्यांच्या आरमाराबद्दल सावधान’ असण्याबद्दलचे पत्र लिहिले. शिवरायांनी १६५७ पासून कल्याण-भिवंडी परिसरात आरमार बनवण्याचा उद्योग सुरु केला होता. यात लढाउ तसेच व्यापारी जहाजे सुद्धा होती. त्यामुळे सतर्क होवून पोर्तुगिझ गवर्नरने हे पत्र लिहिले. सदर पत्राचा मराठी अनुवाद- “शहाजीचा मुलगा (शिवाजी) याने आदिलशाहीच्या ताब्यामधील वसई ते चेउल मधला बराच भूभाग जिंकला असून त्याने स्वतःची लढण्याची ताकद वाढवली आहे. त्याने कल्याण, भिवंडी, पनवेल ह्या वसईच्या आसपासच्या बंदरांमध्ये काही लढाउ जहाजे बनवली आहेत. आम्हाला आता सतर्क रहायला हवे. ही जहाजे बंदरामधून खुल्या समुद्रात बाहेर येणार नाहीत यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश आम्ही पोर्तुगिझ कप्तानाला दिले आहेत.”

 १६७७ दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज तुंदुमगुर्तीला आले. या मुक्कामात महाराजांना भेटण्यासाठी तेवेनापट्टणमचे डच अधिकारी आले होते.

AUGUST 7

  शिवकालीन दिनविशेष 

 ७ ऑगस्ट १६७५ छत्रपती श्री शिवरायांनी “कोल्हापूर” जिंकले.  

१६७९ छत्रपती श्री शिवरायांच्या सूचनेवरून “खांदेरी-उंदेरी” किल्ल्यावर गोड्या पाण्याचे झरे खोदून तिथे विहीरी बांधण्याचे काम चालू झाले.


AUGUST 8

 शिवकालीन दिनविशेष 

 ८ ऑगस्ट १६७६ छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून “किल्ले महीपतगड” वर हवालदार “दसमाजी नरसाळा” यांस तर “किल्ले सज्जनगड” वर हवालदार “जिजोजी काटकर” यांस कारभाराविषयी पत्र.  

 १६८३ संभाजीराजांनी पोर्तुगीजांवरची मोहिम आखली आणि पोर्तुगीजांच्या चौलला वेढा घातला.



AUGUST 9

 

 शिवकालीन दिनविशेष 

 ९ ऑगस्ट १६५४ शिवाजीराजांनी निळोपंताना पुरंदरसाठी इनामपत्र दिले. हे पत्र खालील प्रमाणे मसरूल हजरत अखंडित लक्ष्मी राजमान्य नीळकंठराऊ प्रती राजेश्री सिवाजी राजे दंडवत ।। उपरी ।। तुम्ही राजेश्री बाबाजी नाईकाबराबरी पत्र पाठविले ते पावोन लिहिल्याप्रमाणे सविस्तर वर्तमान कळो आले व कित्येक मुखवचने नाईक माइले हाती सांगोन पाठविले तिही सविस्तर सांगितले व नाईक बोलिले की आम्ही त्यांसी तह केला आहे की जैसे काही राऊ गोसावी साहेबांसी वर्तत होते तैसेची हेही साहेबांसी वर्ततील व साहेब जैसे राजश्री राऊ गोसावी यांचे चालवत होते तैसेच यांचेही चालवावे ऐसा निश्चय करून आपण आलो असो म्हणऊन बोलिले ।। तरी जे काही बाबाजी नाईक तुम्हासी निश्चय केला तोच आमचा निश्चय आहे ।। जैसे काही राऊ गोसावी आम्हासी वर्तत होते तैसेच तुम्हीही आम्हास वर्तत जाणे व आम्ही जैसे काही राऊ गोसावी यांचे चालवित होतो तैसेच तुमचे चालऊन ।। एविशई आम्हास श्रीची व राजश्री साहेबांच्या पायांची व सौभाग्यवती मातोश्री साहेबांच्या पायांची आण असे व ये विशयी श्रीचा दवणा पाठविला असे तो घेणे व जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमान वर्ताल तोपर्यंत आम्हीही तुम्हासी इमाने वर्तोन ।। तुम्हापासून इमानात अंतर पडिलिया आमचाही इमान नाही ।।छ ६ सौवाल सु।। खमस खमसैन अलफ ।। हे पत्र पुरंदरचा किल्लेदार महादजी नीळकंठराव ह्यांच्या मृत्यूनंतर लिहिलेले दिसते.

AUGUST 10

 शिवकालीन दिनविशेष 

 १० ऑगस्ट १६६० “छत्रपती शिवराय” किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटल्यावर त्यांच्या पाठलागावर “सिद्दी जौहर” स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली.  

१६६६ “छत्रपती शिवराय” आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती.

 १७४९ चावंड किल्ल्याचा हवालदार संताजी मोहिते याच्या सनदेत किल्ला मुघलांकडून घेतल्याचा उल्लेख आहे आणि सुटलेल्या जिनसाची मोठी यादी जोडली आहे. यात भांडी, घरगुती, वस्तू, हत्यारे, पाळीव प्राणी यांची नोंद आहे.  

 १७५५ थोरल्या माधवरावाचा धाकटा भाऊ नारायणराव याचा जन्म.  

 १७६० सदाशिवराव भाऊसाहेबांनी दिल्ली काबीज करून दिनांक १० ऑगस्ट सन १७६० रोजी परागंदा झालेल्या बादशहाच्या पुत्र शहजादा जवानबख्त याला वलीअहद म्हणजे युवराज बनवले

AUGUST 11

 शिवकालीन दिनविशेष  

११ ऑगस्ट १८०३ इंग्रजी लोकांनी अहमदनगर चा किल्ला लाच देऊन घेतला.

AUGUST 12

Shivkalin dinvishesh शिवकालीन दिनविशेष 

 १२ ऑगस्ट १६५७ शिवरायांनी तत्कालिन बारा मावळ आणि भोर तालुक्यातील खेडेबारे हा मुलुख जिंकला.  

१७६५ बादशह शुजाउद्दोकडून इंग्रजानी बंगालचे दिवाणी हक्क मिळवले.

AUGUST 13

 Shivkalin dinvishesh शिवकालीन दिनविशेष 

 १३ ऑगस्ट १६५७ विजापूरच्या आदिलशहाने थोरले महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांना कैद केले होते. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मराठ्यांना किल्ले सिंहगड आदिलशहाला द्यावा लागला होता. ऐन स्वराज्याच्या छाताडावर उभा असलेला सिंहगड स्वराज्यात असणे अत्यंत गरजेचे होते. पावसाचा फायदा घेऊन राजांनी फौजा पाठवुन सिंहगडावर आकस्मात चढाई करून सिंहगड स्वराज्यात सामील करून घेतला.  

१६६६ औरंगजेब बादशहाने छत्रपती शिवरायांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवल्यामुळे कुंवर रामसिंग हे घाबरले आणि त्यांनी छत्रपती शिवरायांची भेट घेण्याचे नाकारले.

AUGUST 14

Shivkalin dinvishesh 

  १४ ऑगस्ट १६४९ छत्रपती शिवरायांना औरंगजेबाचा पुत्र “मुरादबक्ष” याचे पत्र.  


 १६४९ पुरंदरावर शिवरायांनी फत्तेखानाचा पराभव केला यावेळी आपल्या मुत्सद्दीने मोघल बादशाह शाहजहाँन यास दख्खनच्या सुभेदार, शहजादा मुरादबक्ष यांनी पत्र पाठवून शहाजीराजें सहित मोघलांच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. शाहजहाँनने आदिलशहावर दबाव आणल्यामुळे शहाजीराजेंची सुटका झाली या बदल्यात शिवरायांनी सिंहगड किल्ला आदिलशहाला दिला. १६५७ मराठ्यांनी कोकणातील “दंडाराजपुरी” जिंकली पण “किल्ले जंजिरा” वर मराठ्यांचा पहिला हल्ला, आणि हा प्रयत्न अयशस्वी झाला.या मोहीमेत “शामराव रांझेकर” आणि “बाजी घोलप” या मराठा सरदारांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण जंजिरा हाती लागला नाही. 


१६६० १४ ऑगस्ट १६६० रोजी भुयार खणून मुघलांनी संग्रामदुर्गाचे तटबुरुज उडवले, हे पाहून शाहिस्ते खानाला स्फुरण चढले त्याची फौज विजयाच्या आशेने किल्ल्याच्या दिशेने पळत सुटली एकच कल्लोळ उसळला किल्ल्याला खिंडार पडले जणु हे खिंडार फिरंगोजींच्या छातीलाच पडावे अशी अवस्था फिरांगोजींची झाली तरीही ते दोन्ही हातात तलवारी घेऊन खिंडाराकडे धावत निघाले जणु तिथे एक भिंतच तयार झाली खिंडारावर मराठ्यांची फळी उभी झाली आणि जिद्दीने लढू लागली.

AUGUST 15

 Shivkalin dinvishesh शिवकालीन दिनविशेष 


 १५ ऑगस्ट १६५६ शिवाजीराजांचा गायकवाड घराण्यातील कन्येशी विवाह ठरला ! शिवाजीराजांची ही सहावी सोयरीक. या धर्मपत्नीचे नाव होते सकवारबाई, हा विवाह प्रत्यक्षात १० जानेवारी १६५७ रोजी झाला. 

 १६६० शाईस्तेखानाने चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला सुमारे ५५ दिवसांच्या प्रखर संघर्षानंतर हाती आलेला संग्रामदुर्गाची पाहणी करण्यासाठी शाहिस्तेखान किल्ल्यावर आला. संपूर्ण पाहणी करून त्याने या किल्ल्याचे नाव ठेवले “इस्लामगड”.


१६६६ छत्रपती शिवरायांनी आग्रा कैदेत असताना आपली मौलिक संपत्ती वस्तू, जडजवाहीर मुलुकचंद सराफामार्फत स्वराज्याकडे पाठवून दिली. आग्रा शहरात या घडामोडी घडत होत्या लवकरच आग्रा सोडून दक्खनेत निघण्याची गुप्त खलबते राजांच्या डोक्यात चालू होती

AUGUST 16

  Shivkalin dinvishesh शिवकालीन दिनविशेष  


 १६ ऑगस्ट १६६२ अनाजीपंत स्वराज्याचे नूतन सुरनिस झाले.  


 १६६६ दि.१६ ऑगस्ट इ.स.१६६६ रोजी रामसिंह दरबारात गेल्यावर औरंगजेब त्यास म्हणाला, सीवा मनसब कबूल करील अशातऱ्हेने त्याचे मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यास हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे. औरंगजेबचा निरोप मिळाल्यावर महाराजांनी उत्तर दिले. मला वतनावर पाठवावे, मग जो हुकूम होईल तो मान्य करीन. महाराजांनी पाठवलेला हा निरोप औरंगजेबास शेवटचा होता. कारण यानंतर जे घडणार होते ते संपूर्ण मुघल सलतनतीस अनपेक्षितच होते.  


 १६८१ आतापर्यंत केवळ मराठी मुलखाचीच नासधूस करणारा सिद्दी १६ ऑगस्ट पासून इंग्रजांनाही त्रास देऊ लागला.  


 १७०० बादशहाचे हाल पाहून मराठ्यांना जास्तच चेव चढला. सभोवार घिरट्या घालून त्यांनी शक्य तितक्या उच्छाद चालवला. हनुमंतराव निंबाळकरानी १६ ऑगस्ट रोजी “ख.....

..

. टाव” ठाणे काबीज केले व तेथे मोगलांच्या बाजूने ....


,,....., मराठी अधिकार्याला ठार मारले.

 अनाजी दत्तो प्रभुणीकर हे वाकनिशी करीत होते त्यांना शिवाजी राजांनी सुरनिशीचा हुद्दा सांगितला

AUGUST 17

  Shivkalin dinvishesh  

१७ ऑगस्ट १६६०


  विजापूरचा आदिलशाह शिवाजीराजे व सिद्दी जौहरचा (गद्दारीच्या संशयाने) नायनाट करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने ससैन्य निघाला.




१७ ऑगस्ट १६६६ शिवाजी महाराज ९ वर्षांच्या शंभूराजांच्या चाणाक्ष बुद्धी आणि आई भवानीचे आशीर्वाद यामुळे आग्र्यातून पेटाऱ्यातून पसार झाले


 १६६० आदिलशहाने शिवाजीराजे व सिद्दी जौहरचा (गद्दारीच्या संशयाने) नायनाट करण्यासाठी पन्हाळ्याच्या रोखाने ससैन्य निघाला.  


 १६६६ शिवराय आग्र्याहून सुखरूप बाहेर निघाले. रक्ताचा एक थेंबही न सांडता मुघल सल्तनतीचा त्यांच्याच कर्मभूमीत केलेला दारुण व अब्रूचे धिंडवडे काढणारा पराभव म्हणजेच शिवराय आणि शंभूराजे यांची आग्र्यातून सुखरूप सुटका 

AUGUST 18

 18 August shivkalin dinvishesh १८ ऑगस्ट। शिवकालीन दिनविशेष

  १६६६ आग्रा कैदेतून निसटल्याबरोबर पुर्वनियोजीत व्यूहरचनेनुसार काही गुप्तहेर, निवडक मावळे आग्रा किल्ल्याच्या थोडसं दुरवर एका कुंभारवाड्यात दबा धरुन बसले होते. तेथेच मोठी शेकोटी करुन त्याचा धुर बघत त्या दिशेला शिवराय व मावळे एकत्र जमा होऊन तडक घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट मथुरा मध्ये येऊन पोहोचल्या.

  १६६६ आग्रा शहरात शनिवारचा दिवस उजाडला. दरबाराची वेळ झाली तरी महाराज अजून स्वस्थ झोपल्याचे पाहून रामसिंहाने नेमलेले पहारेकरी बलराम पुरोहित व त्याच्या सहकाऱ्यांना शंका आली,त्यांनी आत बिछान्याजावळ जाऊन पाहताच महाराज तिथे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा हा म्हणता ही बातमी आग्रा शहरात पसरली. रामसिंह आणि फौलादखानाने ही बातमी औरंगजेबाच्या कानावर घातली. महाराजांच्या पहाऱ्यावर असणाऱ्या रामसिंहाच्या बलराम पुरोहित, रामकीशन, जिवा जोशी आणि श्रीकिशन उपाध्याय यांना कैद करण्यात आले. दुपारच्या सुमारास परतीतराय हरकाऱ्याच्या घरात लपून बसलेले रघूनाथपंत, त्रंबकपंत व इतर दोन चाकर(बहुतेक हिरोजी व मदारी) हेही फौलादखानाच्या हाती सापडले. औरंगजेबाने त्यांचा अनन्वित छळ सुरु केला.  

१६८३ मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी बादशहाने रहूल्लाखान यास निराकाठच्या प्रदेशाकडे व बरामदखान यास आष्टीकडे रवाना केले.  

१७०० महापराक्रमी महायोद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म.

AUGUST 19

AUGUST 20

रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर हे शिवाजी महाराजांचे अत्यंत जवळचे साथीदार आग्र्यामध्ये फुलौतखानाला सापडले. शिवाजी राजांचे आग्र्याहून सुटकेचे गुढ उकलवून घेण्यासाठी यांचे आनन्वित हाल करण्यात आले. पण त्या स्वामिनिष्ठांच्या मुखातून ‘ब्र’ ही निघाला नाही. बोलले असते तर संभाजी राजे मथुरेतून खासच पकडले गेले असते, व दोघांनाही औरंगजेबाने मालामाल केले असते.

AUGUST 21

शिवाजी राजांनी सामराजपंतांच्या जागी नरहरी आनंदराव यांना पेशवाई तर अनाजी दत्तो यांना वाकनिशी दिली. मंत्र्यांना पालख्यांची नेमणूक केली.

AUGUST 22

AUGUST 23

AUGUST 24

AUGUST 25

AUGUST 26

AUGUST 27

रायगड फत्ते करून शिवाजी राजांनी चंद्रराव मोर्‍याची मग्रूर गर्दन उडवली.

AUGUST 28

AUGUST 29

AUGUST 30

AUGUST 31

SEPTEMBER 1

SEPTEMBER 2

SEPTEMBER 3

SEPTEMBER 4

  ४ सप्टेंबर १६७७ 


 संभाजी राजे व येसुबाई साहेब यांना शृंगारपूर येथील मुक्कामी भवानी बाई नावाचे कन्यारत्न झाले.

SEPTEMBER 5

SEPTEMBER 6

SEPTEMBER 7

SEPTEMBER 8

SEPTEMBER 9

SEPTEMBER 1

SEPTEMBER 11

SEPTEMBER 12

SEPTEMBER 13

SEPTEMBER 14

SEPTEMBER 15

SEPTEMBER 16

SEPTEMBER 17

SEPTEMBER 18

SEPTEMBER 19

SEPTEMBER 20

SEPTEMBER 21 

SEPTEMBER 22 

SEPTEMBER 23 

SEPTEMBER 24

SEPTEMBER 25

SEPTEMBER 26

SEPTEMBER 27

SEPTEMBER 28

SEPTEMBER 29

SEPTEMBER 30

SEPTEMBER 31

OCTOBER 1

OCTOBER 2

OCTOBER 3

OCTOBER 4

OCTOBER 5

OCTOBER 6

OCTOBER 7

OCTOBER 8

OCTOBER 9

OCTOBER 1

OCTOBER 11

OCTOBER 12

OCTOBER 13

OCTOBER  14

OCTOBER 15

OCTOBER 16

OCTOBER 17

OCTOBER 18

OCTOBER 19

OCTOBER 20

OCTOBER 21

OCTOBER 22

OCTOBER 23

OCTOBER 24

OCTOBER 25

OCTOBER 26

OCTOBER 27

OCTOBER 28

OCTOBER 29

OCTOBER 30

OCTOBER 31

NOVEMBER 1 

NOVEMBER 2

NOVEMBER 3

NOVEMBER 4

NOVEMBER 5

NOVEMBER 6

NOVEMBER 7

NOVEMBER 8

NOVEMBER 9

NOVEMBER 10

NOVEMBER 11

NOVEMBER 12

NOVEMBER 13

NOVEMBER 14

NOVEMBER 15

NOVEMBER 16

NOVEMBER 17

NOVEMBER 18

NOVEMBER 19

NOVEMBER 20

NOVEMBER 21

NOVEMBER 22

NOVEMBER 23

NOVEMBER 24

NOVEMBER 25

NOVEMBER 26

NOVEMBER 27

NOVEMBER 28

NOVEMBER 29

NOVEMBER 30 

NOVEMBER 31

DECEMBER 1 

DECEMBER 2

DECEMBER 3

DECEMBER 4

DECEMBER 5

DECEMBER 6

DECEMBER 7

DECEMBER 8

DECEMBER 9

DECEMBER 10

DECEMBER 11

DECEMBER 12 

DECEMBER 13

DECEMBER 14

१४ डिसेंबर इ.स. १६८२

शहाबुद्दीनखानाचा व मराठा फौजेचा किल्ले लोहगडा

जवळ सामना झाला..!

DECEMBER 15

DECEMBER 16

DECEMBER 17

DECEMBER 18

DECEMBER 19

DECEMBER 20

DECEMBER 21

DECEMBER 22

DECEMBER 23

DECEMBER 24

DECEMBER 25

DECEMBER 26

DECEMBER 27

DECEMBER 28

DECEMBER 29

DECEMBER 30

DECEMBER 31

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या